बहुजननामा ऑनलाइन टीम – शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस मिळाल्यापासून ज्या पद्धतीन ते लिखाण करत आहेत. मनापासून त्यांना एक सल्ला द्यावासा वाटत आहे. (Ashish Shelar)त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची वेळ आली आहे त्यांनी जरूर मनसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, आम्हाला तुमची चिंता आहे, असे म्हणत भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार ( BJP leader and MLA Ashish Shelar) यांनी त्यांना टोला लगावला आहे. तसेच महापालिकेनेही आता प्रभादेवीजवळ मानसोपचार तज्ज्ञांच कार्यालय सुरु करावे, असे शेलार यांनी म्हटले आहे.
ईडीच्या चौकशीवरून शिवसेना आणि भाजपा हे पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. ईडीची चौकशी आणि भाजपा नेत्यांनी घटनेची करून दिलेली आठवण यावरून शिवसेनेनं सामनामधील अग्रलेखामधून भाजपावर घणाघाती टीका केली होती. सीबीआय आणि ईडीसारख्या संस्थांचं अध:पतन सध्या जोरात सुरू आहे. हवाबाण थेरेपीचा अतिरेक झाला की डोक्यात सडकी हवा जाते. त्या हवेच्या ढेकरा सध्या ज्यांना लागत आहेत त्यांचे नाव भाजपा. भाजपाच्या नव्या घटना समितीचा विजय असो. डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य, असा टोला शिवसेनेने सामनामधून भाजपाला लगावला होता. यानंतर भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका करत संजय राऊत यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज असल्याचं म्हटलंआहे.
ज्या प्रकारची भाषा शिवसेना आणि सामनाच्या अग्रलेखातून येत आहे, त्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी किव करावी असे वाटते. महाराष्ट्राच्या राजकारणात सुविद्य, सुविचार आणि संस्काराचा शिवसेनेन कधीच ऱ्हास केला आहे. आज ते सत्तेत बसल्याच दुर्देवही महाराष्ट्र पाहतोय, असे म्हणत शेलार यांनी त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.