बहुजननामा ऑनलाइन टीम – महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशलवर कायमच सक्रिय असतात. आपल्या पोस्टमुळं ते अनेकदा चर्चेतही आले आहेत. पुन्हा एकदा त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे जो चर्चेत आहे.
आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात असं सांगितलं जात आहे की, हैदराबाद येथील मल्लेश्वर राव पार्टीतील उरलेलं अन्न कशा प्रकारे गरजू मुलांना वाटतात. पेशानं इंजिनियर असलेले मल्लेश्वर राव रोज जवळपास 500 ते 2000 लोकांना भोजन देतात. मल्लेश्वर राव यांनी 2011 मध्ये डू नॉट वेस्ट फूड मोहिमेला सुरुवात केली होती. आता त्यांची टीम कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात उरलेलं अन्न जमा करते आणि ते खाण्यायोग्य असेल तर गरजू लोकांमध्ये वाटते.
I will not complain about 2020 being a difficult year after having seen this. Malleshwar Rao, I salute you & will support you. Life isn’t difficult when you remove the difficulties of others… pic.twitter.com/9YmsYhlo87
— anand mahindra (@anandmahindra) December 29, 2020
व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलं की, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर वर्ष 2020 किती कठिण राहिलं या विषयी मी तक्रार करणार नाही. मल्लेश्वर राव मी तुम्हाला सेल्युट करतो आणि सपोर्टही करतो. जेव्हा आपण इतरांच्या अडचणी कमी करतो तेव्हा आयुष्य कठिण नसतं असंही ते सांगतात.
महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावकर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे.
मल्लेश्वर राव यांनी लहानपणी बालमजूर म्हणून काम केलं आहे. त्यांना तेव्हाच जाणीव झाली होती की, उपजीविकेसाठी आपल्याला कमवावं लागणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या हेमलता लावानम यांची भेट झाल्यानंतर त्यांचं आयुष्य बदललं. नंतर त्यांनी गरजू मुलांच्या शाळेत प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण केलं. नंतर त्यांनी इंजिनियरींग केलं.
जेव्हा मल्लेश्वर राव हे मोठ्या शहरात राहायला आले, तेव्हा इथं राहण्यासाठी त्यांना किती खर्च येईल हेही त्यांना माहित नव्हतं असं ते म्हणतात. राव याबाबत बोलताना सांगतात की, एका मित्रानं सांगितलं होतं की, केटरींगच्या कमातून पैसे कामावले जाऊ शकतात. त्यानंतर मी पार्ट टाईम नोकरी सुरू केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, मोठ्या कार्यक्रमात किती अन्न वाया जातं. यानंतर त्यांनी उरलेलं अन्न गरीबांना वाटायला सुरुवात केली. समाजासाठी कशा पद्धतीनं योगदान दिलं जाऊ शकतं हे आपण शाळेत असताना शिकलो असं राव सांगतात. ज्यांना भोजन दान करण्याची इच्छा आहे असे लोकही राव यांना संपर्क करतात.