बहुजननामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री कंगना रणौत ही गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरूनही(Kangana Ranaut) तिने काही अपमानकारक पोस्ट शेअर केल्या होत्या. ज्यावरून तिला मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता. कंगना रणौतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात ती तिच्या परिवारासोबत
नव्या वर्षाच्या ठिक आधी मुंबईत दाखल झाली असून विशेष म्हणजे तिच्या चारही बाजूने सिक्युरिटी तैनात दिसत आहे. मात्र तिची सुरक्षा आधीपेक्षा कमी झाल्याची दिसत आहे.
दिलजीत दोसांज आणि कंगनातील ट्विटर वॉर अजूनही चर्चेचा विषय आहे. दरम्यान याआधी जेव्हा कंगना मुंबईत आली होती तेव्हा तिला Z दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. पण ती सुरक्षा काढून घेतल्याचे दिसते.
कंगना ‘थलायवी’ सिनेमाचं शूटींग करण्यात बिझी होती. त्यानंतर तिने ‘तेजस’ सिनेमाच्या शूटींगलाही सुरूवात केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी कंगना आपल्या मनाली येथील घरी होती. तिने काही दिवसांपूर्वी कंगनाने सांगितले की, ती जानेवारी २०२१ मध्ये तिच्या आगामी ‘धाकड’ सिनेमाचं शूटींग सुरू करणार आहे. या सिनेमात कंगना एजंट अग्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.
शेतकरी आंदोलनावरूनही कंगनाने काही अपमानकारक पोस्ट शेअर केल्या होत्या. ज्यावरून तिला मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता. ट्विटर यूजर्ससहीत अनेक बॉलिवूड कलाकारांनीही तिला ट्रोल केलं होतं.