लखनऊ : वृत्तसंस्था – पूर्व उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनेअंतर्गत मिड डे मील म्हणून मुलांना मीठ आणि चपाती खाण्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर काही दिवसांतच राज्य सरकारने त्या पत्रकाराविरोधात केस दाखल केली आहे ज्याने तो व्हिडीओ शुट केला होता.
आपल्या तक्रारीत प्रादेशिक गटशिक्षणाधिकाऱ्याने पत्रकार पवन जयस्वाल आणि स्थानिक गावप्रमुखाच्या एका प्रतिनिधीवर सरकारला बदनाम करण्यासाठी रचलेल्या कारस्थानाचा भाग असल्याचा आरोप केला आहे.
राज्यातील मिड डे मीलची निगराणी करणाऱ्या उत्तर प्रदेश मिड डे मिल ऑथोरिटीच्या वेबसाईटवर सरकारी प्राथमिक शाळांमध्ये मुलांना दिल्या जाणाऱ्या भोजनाची सविस्तर यादी दिली आहे. ज्यात डाळ, भात, चपाती आणि भाजी असायला हवी. मील चार्टनुसार, काही दिवशी तर त्यांना फळे आणि दूधही वितरीत व्हायला हवं. परंतु मिर्झापूरच्या शाळेतील व्हिडीओमध्ये लहान मुलांना फरशीवर बसून मीठासोबत चपाती खाताना पाहण्यात आलं आहे.
This is Pawan Jaiswal , the #Mirzapur reporter who broke the roti + salt in mid day meal story. He has been booked by @mirzapurpolice for allegedly conspiring against the @UPGovt . In this video he reiterates he reported what he saw . @IndEditorsGuild please take cognizance ! pic.twitter.com/5mU47uufAo
— Alok Pandey (@alok_pandey) September 2, 2019
तीन पानांच्या या FIR मध्ये नमूद करण्यात आलं आहे की, ज्या दिवशी व्हिडीओ शुट केला गेला त्या दिवशी शाळेत फक्त चपात्या बनवण्यात आल्या होत्या. यात असेही म्हटले आहे की, शाळेच्या आवारात पत्रकारांना बोलवण्याऐवजी गाव प्रमुखांच्या प्रतिनिधीने भाजीची व्यवस्था करायला हवी होती. यात असाही उल्लेख आहे की, जनसंदेश टाईम्प्स साठी काम करणाऱ्या स्थानिक पत्रकाराने हा व्हिडीओ शुट केला होता. नंतर हा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेला पाठवण्यात आला. हा व्हिडीओ सोशलवर प्रचंड शेअर झाला त्यामुळे राज्य सरकारची बदनामी झाली. पत्रकार आणि गाव प्रमुख यांच्या प्रतिनिधीवर फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. राज्य सराकरने केलेली ही कारवाई त्या घटनेनंतर जारी केलेल्या विधानाच्या अगदी उलट आहे.
मिर्झापूरमधील उच्च सरकारी अधिकारी अनुराग पटेल यांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, “मी तपासाचे आदेश दिले आहेत. ही घटना खरी असल्याचं समोर आलं आहे. प्राथमिकदृष्ट्या ही शाळेतील प्रभारी शिक्षक आणि ग्रामपंचायतीच्या पर्यवेक्षकाची चूक असल्याचं समजत आहे. दोघांना निलंबित करण्यात आले आहे.”
उत्तर प्रदेश सरकारच्या मते डिसेंबर 2018 मध्ये राज्यभरातील दीड लाख प्राथमिक तसेच मध्यम शाळांमध्ये मिड डे मील उपलब्ध केलं जात आहे. या योजनेनुसार 1 कोटींहून अधिक मुलांना लाभ होणे अपेक्षित होते.
केंद्र सरकारच्या मते, मिड-डे मील योजनेमध्ये प्रत्येक मुलाला दररोज किमान 12 ग्रॅम प्रथिनेसह(प्रोटीन) किमान 450 कॅलरी प्रदान करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. हे भोजन वर्षाकाठी किमान 200 दिवस प्रत्येक मुलासाठी उपलब्ध करुन दिले जावे.
- १४ दिवसांत कमी होऊ शकते ७ किलो वजन, हा ‘डाएट प्लॅन’ करा फॉलो
- थर्मामीटरने घरीच करा ‘थायरॉइड टेस्ट’, जाणून घ्या पद्धत
- ‘हे’ माहित आहे का ? लसणाची सालसुद्धा आहे औषधी, हे आहेत ५ फायदे
- फक्त ५ रुपयांचे ‘हे’ ज्यूस, दूर करेल ७ आरोग्य समस्या, जाणून घ्या कसे बनवावे
- ३० वयानंतर पुरूषांमध्ये होतात ‘हे’ बदल, करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या
- चुकूनही खाऊ नका ‘गरम’ केलेला ‘मध’, अन्यथा होतील ‘हे’ दुष्पपरिणाम
- नेहमी तरुण आणि निरोगी ठेवणारे आयुर्वेदिक साधेसोपे उपाय, जाणून घ्या
प्लास्टिक वापरताय? ‘हे’ लक्षात ठेवा, होऊ शकतात कँसरसारखे गंभीर आजार - गरोदर होताच महिलांच्या शरीरात होतात ‘हे’ ५ बदल, तुम्हाला माहिती आहे का?
- नाभीवर ‘या’ ४ गोष्टी लावल्याने चेहऱ्यावर पडतो असा प्रभाव, जाणून घ्या उपाय
- ‘ब्लड ग्रुप’नूसार असा बदला आहार, झटपट कमी होईल वजन, जाणून घ्या
- वारंवार ‘डोकेदुखी’ होण्याची ५ कारणे, जाणून घ्या त्यावरील उपाय
- पौरुषत्व आणि वीर्य वृद्धीसाठी रामबाण आहेत ‘हे’ ५ आयुर्वेदिक उपाय
- रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ ७ पदार्थ, होईल एवढे नुकसान, जाणून घ्या
- भूक लागत नसेल तर करा ‘हे’ ८ सोपे उपाय, त्वरित दुर होईल समस्या