सातारा : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षात अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप- शिवसेने मध्ये प्रवेश केला असून अजूनही काही नेते पक्षांतर करण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु आहे. काल १ सप्टेंबर रोजी सोलापुरात झालेल्या भाजपच्या महाजनादेश यात्रेत अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला, त्यामुळे उदयनराजे देखील या महाजनादेश यंत्राच्या समारोप सोहळ्यात भाजप प्रवेश करतील असा अंदाज वर्तविला जात होता. परंतु त्यांचा हा निर्णय अद्याप तरी अधांतरी असल्याचे चित्र समोर आले आहे. ‘माझ्या सोबतच्या अनेक सहकार्यांना मी विचार करून निर्णय घ्या,’ असे सांगिल्याच उदयनराजे यांनी म्हंटल आहे.
काल उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांची बैठक बोलावण्यात आली होती. आगामी काळातील राजकीय वाटचालीतील निर्णय घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात बोलताना उदयनराजे म्हणाले कि, ‘ जो काही निर्णय होईल , तो लोकांच्या हितासाठीच असेल , माझ्या सहकार्यांना तुम्ही विचार करून निर्णय घ्या आणि मला सांगा , असे मी सांगितले आहे. गेल्या २५- ३० वर्षे लोकांनी मला साथ दिली ती माझ्यासाठी महत्वाची आहे.
‘ तसेच राष्ट्रवादी – काँग्रेसच्या सत्तेवेळी माझं एकही काम झालं नाही. मी त्यांना सांगून सांगून थकलो ,पण माझं काम त्यांनी केलं नाही. असा आरोप करत उदयनराजे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर घणाघात केलं आहे. तसेच आम्ही लोकांच्या हितासाठी लढलो , रास्तारोको केला त्यासाठी आमच्यावर खटले दाखल झाले , ३०२, ३०७ सारखे गुन्हे दाखल झाले. खंडणीची केस दाखल झाली. हे सगळे खोटे आरोप आमच्यावर लादले गेले , असेही ते म्हणाले .
तर दुसरीकडे ते उदयनराजे म्हणले कि, ‘ राजकारण आहे, त्यामुळे सत्ता इकडची तिकडं सुरूच असते ,आम्ही सत्तेचा कधीच अट्टहास धरीत नाही मेगाभरतीला आम्ही भीक घालत नाही. आणि आम्हाला त्याची गरजदेखील वाटत नाही . त्यांच्या या बोलण्यामुळे त्यांचा काहीच अंदाज लागत नाही .
- १४ दिवसांत कमी होऊ शकते ७ किलो वजन, हा ‘डाएट प्लॅन’ करा फॉलो
- थर्मामीटरने घरीच करा ‘थायरॉइड टेस्ट’, जाणून घ्या पद्धत
- ‘हे’ माहित आहे का ? लसणाची सालसुद्धा आहे औषधी, हे आहेत ५ फायदे
- फक्त ५ रुपयांचे ‘हे’ ज्यूस, दूर करेल ७ आरोग्य समस्या, जाणून घ्या कसे बनवावे
- ३० वयानंतर पुरूषांमध्ये होतात ‘हे’ बदल, करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या
- चुकूनही खाऊ नका ‘गरम’ केलेला ‘मध’, अन्यथा होतील ‘हे’ दुष्पपरिणाम
- नेहमी तरुण आणि निरोगी ठेवणारे आयुर्वेदिक साधेसोपे उपाय, जाणून घ्या
प्लास्टिक वापरताय? ‘हे’ लक्षात ठेवा, होऊ शकतात कँसरसारखे गंभीर आजार - गरोदर होताच महिलांच्या शरीरात होतात ‘हे’ ५ बदल, तुम्हाला माहिती आहे का?
- नाभीवर ‘या’ ४ गोष्टी लावल्याने चेहऱ्यावर पडतो असा प्रभाव, जाणून घ्या उपाय
- ‘ब्लड ग्रुप’नूसार असा बदला आहार, झटपट कमी होईल वजन, जाणून घ्या
- वारंवार ‘डोकेदुखी’ होण्याची ५ कारणे, जाणून घ्या त्यावरील उपाय
- पौरुषत्व आणि वीर्य वृद्धीसाठी रामबाण आहेत ‘हे’ ५ आयुर्वेदिक उपाय
- रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ ७ पदार्थ, होईल एवढे नुकसान, जाणून घ्या
- भूक लागत नसेल तर करा ‘हे’ ८ सोपे उपाय, त्वरित दुर होईल समस्या