बहुजननामा ऑनलाईन – उन्नाव बलात्कार पीडित तरुणीच्या अपघाताच्या प्रकरणामध्ये बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी षडयंत्रचा आरोप लावला आहे. मायावती यांनी सांगितले की, ‘उन्नाव बलात्कार पीडितच्या कारचा रायबरेलीमध्ये अपघाताआधी तिला जीवे मारण्याचे षडयंत्र रचले गेले असावे. ज्यामध्ये तिची काकु व मावशी यांचा जागीच मृत्यू झाला आणि पीडित आणि तिचे वकील गंभीर रुपाने घायाळ झाले आहे. सुप्रीम कोर्टाने आपली भूमिका घ्यावी आणि दोषींवर कठोर कारवाईची खात्री करावी.’
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ही पीडिता तरुणीसोबत झालेल्या दुर्घटनेची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसने देखील या घटनेची चौकशीची मागणी केली आहे. कॉंग्रेस महासचिव प्रियंका गांधी म्हणाल्या की, या केसमध्ये चालणारी सीबीआयची चौकशी कुठपर्यंत आली आहे ? पीडित तरुणी आणि साक्षीदारांच्या सुरक्षिततेत कमतरता का ? या प्रश्नांची उत्तरे न देता, भाजपा सरकारकडून न्यायाची काही आशा असू शकते का?
उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ सरकार म्हणाले की, उन्नाव येथील पीडित तरुणीची इच्छा असेल तर त्यांचे सरकार रायबरेली प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यास तयार आहे. या अपघातात दोन लोकांचा मृत्यू झाला होता आणि पीडित महिला व तिचा वकील गंभीर जखमी झाले होता. उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक (डीजीपी) ओ.पी. सिंह यांनी सांगितले की, बलात्कार पीडित तरुणीला तीन खासगी सुरक्षा कर्मचारी देण्यात आले होते परंतु, कारमध्ये जागा नसल्यामुळे तरुणीने सुरक्षा कर्मचाऱ्यांना तिथेच थांबायला सांगितले होते. ते म्हणाले की, प्राथमिक तपासणीत हे अपघाताचे प्रकरण आहे कारण ट्रक वेगाने जवळ येत होता. ते म्हणाले की, साक्षीदारांचीही निवेदने नोंदविण्यात आली आहेत.