मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी अर्थव्यवस्थेतील मंदीबाबत केलेलं वक्तव्य माघारी घेतलं आहे. रविशंकर प्रसाद यांनी अर्थव्यवस्थेत मंदी असल्याच्या वृत्ताचं खंडन केलं. आपलं म्हणणं पटवून देताना त्यांनी सिनेमातील कमाईचा आधार घेतला होता. रवीशंकर प्रसाद म्हणाले, “2 ऑक्टोबर रोजी रिलीज झालेल्या 3 सिनेमांनी 120 कोटी कमावले आहेत. अर्थव्यवस्था तंदुरुस्त आहे म्हणून तर सिनेमांनी एवढी कमाई केली आहे.
रवीशंकर प्रसाद म्हणाले, “सोशल मीडियावर प्रेस कॉन्फरंसचं पूर्ण व्हिडीओ उपलब्ध आहे. तरीही मला हे पाहून वाईट वाटलं की, माझ्या वाक्याचा विपर्यास करण्यात आला. मी एक संवेदनशील व्यक्ती आहे. त्यामुळे मी माझं वक्तव्य परत घेतो.”
Union Minister Ravi Shankar Prasad: Entire video of my media interaction is available on my social media. Yet I regret to note that one part of my statement has been completely twisted out of context. Being a sensitive person I withdraw my comment. https://t.co/AStYrcoE6v
— ANI (@ANI) October 13, 2019
अर्थव्यवस्थेतील मंदीचं खंडन
मोदी सरकारमध्ये कायदे मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे रवीशंकर प्रसाद यांनी शनिवारी प्रेस कॉन्फरंसमध्ये बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेतील मंदीचे पूर्णपणे खंडन केले होते. अर्थव्यवस्थेतील मंदी नाकारत त्यांनी म्हटलं होतं की, “मला सिनेमे आवडतात. सिनेमा मोठा व्यापार करत आहेत. 2 ऑक्टोबर रोजी 3 सिनेमे रिलीज झाले. सिनेसृष्टीतील तज्ज्ञांनी सांगितलं आहे की, नॅशनल हॉलिडेच्या दिवशी 3 सिनेमांनी 120 कोटींची कमाई केली. अर्थव्यवस्था तंदुरुस्त आहे म्हणून तर सिनेमांनी एवढी कमाई केली आहे.
6 वर्षातील सर्वात खाली विकास दर
चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत विकास दर 6 वर्षातील खालच्या स्तरावर म्हणजेच 5 टक्क्यांवर आला आहे. रिझर्व्ह बँकेसहित जगातील अनेक मोठ्या रेटींग एजिन्सीजने भारतातील विकास दरात कपात झाल्याचा अनुमान लावला आहे. वास्तविक पाहता सरकारने अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अनेक पावलांची घोषणा केली आहे.
Visit : bahujannama.com