नवी दिल्ली : वृत्त संस्था – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमांत केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत सांगितले कि, आठ दिवसांत दिलेलं काम पूर्ण करा नाही केले तर, लोकांना कायदा हातात घ्यायला सांगून धुलाई करायला लावेल . नागपुरात आयोजित राष्ट्रीय अधिवेशनाच्या एका लघु उद्योग कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी हे उच्चार काढले. दरम्यान ते लालफीतशाही बद्दल नाराजगी व्यक्त करत होते.
एमएसएमई सेक्टर मध्ये काम करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) शी निगडित लघु उद्योग भरती कार्यक्रमात नितीन गडकरी सांगत होते कि , त्यांनी अधिकाऱ्यांना काही सुचना दिल्या आहेत, कि काही गोष्टी जर लवकर सुटत नसतील तर , ते लोकांना सांगितलं कि ह्यांना चोप द्या.
गडकरी पुढे म्हणतात कि, ” आपल्या कडे ही लालफीतशाही का आहे ? , हे उपनिरीक्षक का येतात ? , लाच घेतात, मी त्यांच्या तोंडावर सांगेल कि , ते सरकारी नोकर आहेत, मी लोकांद्वारा निवडून दिलेला प्रतिनिधी आहे, मी लोकांप्रती जबाबदार आहे, जर तुम्ही चोरी करत आहेत तर, तुम्ही चोर आहात. ”
नितीन गडकरी म्हणाले कि, ” आज मी एका आरटीओच्या बैठकीत गेलो होतो , जिथे निदेशक आणि परिवहन आयुक्त हे देखील उपस्थित होते, मी त्यांना सांगितले कि, आठ दिवसांच्या आत ह्या अडचणींनाच निकाल लावा, नाहीतर तर मी लोकांना कायदा हातात घ्यायला लावून तुमची धुलाई करण्यास सांगेल , ” ते पुढे म्हणाले कि मला माझ्या शिक्षकांनी शिकवले आहे कि, अश्या सिस्टीम ला बाहेर फेका जी काम करत नाही .
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिवेशनात सहभागी होणाऱ्या सर्वांशी मोकळेपणाने संवाद साधला आहे. त्यांनी व्यवसायाचा विस्तार करण्यास सांगितले, तसेच त्यांनी सांगितले कि अधिकारी व्यापारकर्त्यांना त्रास देऊ शकत नाही.