वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशातील सहारनपूर जिल्हयात रविवारी सकाळी धक्कादायक घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून झालेल्या भांडणातून अज्ञात मारेकऱ्यांनी एका पत्रकारासह त्याच्या भावाचा गोळया झाडून खून केला आहे. मारेकरी फरार झाले असून पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत.
Journalist Ashish Janwani and his brother shot dead by unidentified assailants in Saharanpur. Police begin investigation. pic.twitter.com/NsWtcrDhxO
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) August 18, 2019
पत्रकार आशिष जनवाणी आणि त्यांचा भावाचा गोळया झाडून खून करण्यात आला आहे. सहारनपूर जिल्हयातील कोतवाली भागातील गढी मलूक येथे आशिष जनवाणी हे परिवारासह रहावयास होते. गावातीलच एकाशी त्यांचे जमीनीवरून वाद होते. रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अज्ञात मारेकèयांनी आशिष आणि त्यांच्या भावावर गोळया झाडल्या. जखमी अवस्थेत असलेल्या आशिष आणि त्यांच्या भावाला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.