मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या सोबत चर्चा करून सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. तसेच भाजपने सत्ता स्थापनेस असमर्थता दाखवल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आघाडीसोबत जाण्याबाबत आम्हाला शुभेच्छा दिली. मित्रानेच आम्हाला आघाडीसोबत जाण्याचा मार्ग दाखवला असल्याचा सांगत युती तुटलीअसल्याच्या प्रश्नाला बगल दिली. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हणाले, भाजपने आमच्यावर आरोप केला होता.
#WATCH Mumbai: Shiv Sena chief Uddhav Thackeray reacts to a question 'Is the BJP option completely finished?'. Says, "Why are you in such a hurry? It's politics. 6 months time has been given (President's Rule). I didn't finish the BJP option, it was BJP itself which did that…" pic.twitter.com/3pew41hMuF
— ANI (@ANI) November 12, 2019
शिवसेनेला राष्ट्रवादी सोबत चर्चा करण्यासाठी वेळ आहे. पण आमच्यासोबत चर्चा करण्यास वेळ नाही. मात्र, आज राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेने पहिल्यांदाच सोमवारी पाठिंब्याबाबत चर्चा केल्याचे सांगितले. त्यामुळे कोण खोट बोलतं हे आता स्पष्ट झाले आहे. भाजपने दिलेला शब्द न पाळता त्यांनीच युती तोडली असल्याचा आरोप त्यांनी केली.
ज्याप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीला काही मुद्यावर स्पष्टता पाहिजे त्याच प्रमाणे शिवसेनेलाही काही मुद्यांवर स्पष्टता हवी आहे. आम्ही दोन विचारधारेचे पक्ष आहे. हे पक्ष एकत्र कसे येणार हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. याचे लवकरच उत्तर मिळेल. मात्र, मेहबुबा मुफ्ती आणि भाजप, नितेशकुमार, चंद्रबाबू नायडू हे कसे एकत्र येऊ शकतात याची माहिती मी मागितली आहे. त्यामुळे आम्ही वेगळे विचारधारा असलेले पक्ष एकत्र कसे येणार हे लवकरच सांगू असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
Visit : bahujannama.com