मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेचा तिडा अद्याप सुटला नसून राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. शिवसेनेला सत्ता स्थापन करता आली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रीत करण्यात आले. मात्र, राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेसाठी वेळ मागितल्याने राज्यपालांनी राष्ट्रपती यांच्याकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्ताव केला. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती लागू झाली. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये एक बैठक पार पडली यामध्ये शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली. बैठकित सविस्तर चर्चा झाल्यानंतर पुढील रणनिती ठरवली जाईल असे आघाडीकडून सयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
शिवसेनेने राष्ट्रवादीकडे पाठिंबा मागितला असून त्यांना पाठिंबा देण्यावरून आजच्या बैठकीत चर्चा झाली. शिवसेनेसोबत चर्चा करून पुढील रणनीती ठऱवली जाईल असे प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. काही मुद्यांवर स्पष्टीकरणाची आवश्यता आहे. ते स्पष्ट झाल्यानंतरच पाठिब्याबाबत निर्णय घेण्यात येईल. मात्र, अद्याप तरी पाठिबा देण्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. किमान समान कार्यक्रमासह अनेक मुद्यावर चर्चा आवश्यक असल्याचे आघाडीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिवसेनेने सोमवारी पहिल्यांदा अधिकृतपणे राष्ट्रवादीकडे पाठिंबा मागितला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
NCP Chief Sharad Pawar: We are in no hurry. We will hold discussions with Congress and then take a decision (to support Shiv Sena). #MaharashtraGovtFormation pic.twitter.com/MYYYgEpKv0
— ANI (@ANI) November 12, 2019
दरम्यान, सत्ता स्थापनेबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा निरोप घेऊन काँग्रेसचे एक शिष्टमंडळ आज दिल्लीहून मुंबईत आले. मुंबईमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्ता स्थापन आणि राष्ट्रपती राजवट यावर चर्चा झाली. बैठकीमध्ये दोन्ही पक्षातील नेत्यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्यावर आणि पुढील वाटाघाटीवर चर्चा झाल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिट्रीट हॉटेलमध्ये आपल्या आमदारांची भेट घेऊन दिलासा दिला.
Visit : bahujannama.com