बहुजननामा ऑनलाईन टीम – झारखंडमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत त्यातच भाजपची मित्र पक्षांसोबत कुरकुर सुरु झाली आहे. महाराष्ट्रात देखील शिवसेनेने भाजप सोबतची आपली युती तोडून टाकली आहे. झारखंडमध्ये देखील आजसु आणि लोक जनशक्ति पार्टी भाजप पासून वेगळी झाली आहे. कालपर्यंत झारखंडमध्ये ऑल झारखंड स्टूडेंट्स यूनियन पार्टी (आजसु ) भाजपसोबत युतीमध्ये होते मात्र आता त्यांनी भाजपची साथ सोडल्याचे चित्र आहे.
आजसुने त्या चार जागांवर देखील उमेदवार घोषित केलेले आहेत ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आजसुच्या मते भाजपला फक्त त्यांच्यासमोर झुकतील आणि त्यांचच ऐकतील असे लोक हवे आहेत. आजसुने या निवडणुकीत आपला स्टॅन्ड बदलल्याने भाजपचे सर्व समीकरण बदलणार आहे. आजसुला भाजपा 80 पैकी 9 जागा देणार होते पण आजसु 14 वरच अडून बसले. यातून भाजप सावरते न सावरते तोच रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा केली.
झारखंडमधील 81 पैकी 50 जागांवर रामविलास पासवान यांच्या पक्षाने आपले उमेदवार उभे करण्याची घोषणा केल्यानंतर भाजपशी एलजेपीचे जागावाटप होऊ शकली नाही. कॉंग्रेस सोबत आरजेडी आणि झारखंड मुक्ती मोर्चा आहे. विरोधात मात्र भाजप एकटा उभा आहे. भाजपचे सर्व मित्रपक्ष या ठिकाणी वेगळे लढताहेत. एकूणच झारखंडमध्ये भाजपचा आत्मविश्वास कमकुवत झाला आहे. त्यातच भाजपच्या मित्र पक्षांनी ऐनवेळी साथ सोडल्याने भाजप आता खिंडीत सापडले आहे. यामुळे अवघ्या देशाचे लक्ष आता झारखंड निवडणुकांकडे लागलेले आहे.
Visit : bahujannama.com