बहुजननामा ऑनलाईन टीम : आपल्या वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात (सीएए) तोंड उघडल्याने भाजपाने त्यांच्यावर पलटवार केला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करून यावर निशाणा साधल्यावर काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिले. एमपी सरकारमधील मंत्री जयवर्धन सिंह यांनी ट्विट केले की, आता त्यांचे राज्य नाही, ते तर व्यापमंच्या इतिहासात आहेत. थोडी वाट पहा… काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या वादग्रस्त वक्तव्याला सध्या भाजपा उत्तर देत आहे. भाजपाने म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करण्यासाठी काँग्रेसने आपले ब्रह्मास्त्र मैदानात उतरवले आहे.
अय्यर यांनी म्हटले होते, मी वाटेल ती किंमत चुकवण्यास तयार
मंगळवारी दिल्लीच्या शाहीन बागमध्ये आंदोलनकर्त्यांमध्ये पोहोचलेल्या मणिशंकर अय्यर यांनी म्हटले होते की, बघुयात कोणाचा हात मजबूत आहे, आमचा की मारेकर्यांचा. जे मी तुमच्यासाठी करू शकतो ते सर्व करण्यास तयार आहे. मी हा शब्द देतो. तसेच जी किंमत मोजायला तुम्ही तयार आहात त्यामध्ये मी सुद्धा सहभागी आहे. आता बघुयात कोणाचा हात मजबूत आहे, आपला की मारेकर्यांचा.
झूठ टूट कर ज़ोर-ज़ोर से शोर मचा गया,
हर एक सच्चे इंसान को अपना कातिल बता गया।जो न मणि है ना था जो कभी शंकर,
वो अपनी ऐयारी के तेवर सब को बता गया।— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) January 15, 2020
शिवराज यांनी साधला अय्यर यांच्यावर निशाणा
या वक्तव्यावर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी टीका करताना ट्विट केले की, झूठ टूट कर ज़ोर-ज़ोर से शोर मचा गया, हर एक सच्चे इंसान को अपना कातिल बता गया. जो न मणि है ना था जो कभी शंकर, वो अपनी ऐयारी के तेवर सब को बता गया.
ना तो "शिव" में हो, ना "राज" में हो
आप तो 'व्यापमं' के इतिहास में होथोड़ा इंतज़ार कीजिए … https://t.co/f3M39yoUWJ
— Jaivardhan Singh (@JVSinghINC) January 15, 2020
शिवराज सिंह चौहान यांच्यावर जयवर्धन सिंह यांचा पलटवार
शिवराज सिंह यांनी ट्विट करताच मध्ये प्रदेश सरकारमधील मंत्री जयवर्धन सिंह यांनी प्रत्युत्तर देत त्यांच्या वरमा वर बोट ठेवले. जयवर्धन सिंह यांनी ट्विट केले की, ना तो शिव में हो, ना राज में हो, आप तो व्यापमं के इतिहास में हो….थोड़ा इंतज़ार कीजिए …
काय आहे व्यापमं घोटाळा
व्यापमं घोटाळ्याचा मोठा खुलासा जुलै, 2013 मध्ये प्रथम पीएमटी परीक्षादरम्यान झाला, जेव्हा एक टोळी इंदोरच्या गुन्हे शाखेने पकडली. ही टोळी पीएमटी परीक्षेमध्ये खोटे विद्यार्थी बसविण्याचे काम करत होती. तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी हे प्रकरण ऑगस्ट 2013 मध्ये एसटीएफकडे दिले. हाय कोर्टने याची दखल घेऊन हाय कोर्टचे रिटायर्ड जज चंद्रेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली एप्रिल 2014 मध्ये एसआयटी गठीत केली, जिच्या देखरेखीखाली एसटीएफ तपास करत होती. 9 जुलै, 2015 ला प्रकरण सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि 15 जुलैपासून सीबीआयने तपास सुरू केला.
30 लोकांना 7 वर्षांची शिक्षा, एका दोषीला 10 वर्षांचा करावास
तत्कालीन सरकारचे माजी मंत्री लक्ष्मीकांत शर्मा, त्यांचे ओएसडी ओपी शुक्ला, भाजपा नेते सुधीर शर्मा, राज्यपालांचे ओएसडी धनंजय यादव, व्यापमंचे नियंत्रक पंकज त्रिवेदी, कम्प्यूटर अॅनालिस्ट नितिन मोहिंद्रा यापक्ररणी जेलमध्ये गेले आहेत. याप्रकरणी आतपर्यंत तब्बल दोन हजार लोक जेलमध्ये गेले आहेत. चारशेपेक्षा जास्त लोक अजूनही फरार आहेत. तर, 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
Visit : bahujannama.com