मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – देशात जीएसटी कायद्यामुळे नवउद्योजक आणि छोटया उद्योगांचे कंबरडे मोडले आहे तसेच सध्या देशातील कामगार क्षेत्रावर विविध संकटांचे सावट आहे. देशातील छोटेमोठे उद्योग टिकले, तर कामगार टिकतील, त्यामुळे उद्योग क्षेत्र टिकविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याची गरज आहे. स्वातंत्र्य काळापासून तर आजपर्यंत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठे लढे द्यावे लागले त्यानंतर कुठे कामगारांसाठी विविध कायदे तयार करण्यात आले आहेत असे प्रतिपादन भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस आमदार भाई जगताप यांनी केले.
महासंघाच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जीएसटी, नोटाबंदी यांसारख्या निर्णयांमुळे कामगार व कर्मचाऱ्यांना त्यांचे वर्षानुवर्षांचे रोजगार गमवावे लागले. लाखो नागरिकांचा रोजगार धोक्यात आल्यानंतर, देशात अराजकता निर्माण होण्याची भीती होती, या सर्व गोष्टीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.