नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – देशात लोकसभा निवडणुका सुरु असून पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. अजून दोन टप्प्यातील मतदान बाकी आहे. तेथील प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. नोटाबंदी हा देशातील स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा आहे तसेच मोदींनी राफेलमधून बक्कळ पैसा कमावला, त्याच पैशानं आता मोदी आमदार विकत घेत आहेत.जर व्यापाऱ्यांनी भाजपाला मतदान केलं तर सीलिंग सुरूच राहणार आहे. पण ‘आप’ला मतदान केल्यास सीलिंग थांबू शकतं, असंही केजरीवाल म्हणाले .
केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोदींवर गंभीर आरोप केले . देशात टॅक्स टेररिझम पसरला आहे. त्यामुळे देशात भीती आहे. मोदी सगळीकडे सांगत सुटले आहेत कि आह्मी दहशतवाद्यांना घरात घुसून मारलं, पण पाकिस्तानवाले पुन्हा मोदीच पंतप्रधान व्हावेत असे म्हणतात यातून असे सिद्ध होतेय कि मोदींचे पाकिस्तानबरोबर गहन संबंध आहेत. मग ते राष्ट्रवादाच्या कोणत्या व्याख्येत बसतात असंही केजरीवाल म्हणाले. यंदाच्या निवडणुकीत दिल्लीत ‘आप ‘ला पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वळवली जात आहे .