मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भारतीय क्रिकेट संघात त्याच्या कारकिर्दिला सुरवात होण्यापुर्वी त्याने वेगवेगळ्या वयोगटातून शहर क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताच्या अंडर १९ संघाने २००८ मध्ये मलेशिलायात झालेला विश्वकप जिंकला होता. त्यानंतर वयाच्या १९ व्या वर्षी श्रीलंका विरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यातून त्याने भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले. सुरवातीला संघात राखीव फंलदाज म्हणून खेळला. त्यानंतर त्याने स्वतःला सिद्ध करत त्याचे संघातील स्थान कायम केले. संघात स्वतःचे स्थान मिळविल्यानंतर त्याने २०११ मध्ये विश्वकप जिंकला. सचिनने त्याच्या कारकिर्दित ७६ वेळा सामनावीराचा किताब मिळविला आहे आणि आजपर्यंत कोणीही त्याचा विक्रम मोडू शकले नाही. सनथ जयसुर्या हा विक्रम मोडू शकला असता मात्र त्यालाही हा विक्रम मोडता आला नाही.
हा व्यक्ती तोडू शकतो रेकॉर्ड
भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या कारकीर्दीत अनेक मोठी विक्रम नोंदविली आहेत. त्याला ४२ वेळा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळाला आहे. तो एकमेव फलंदाज असा आहे की जो हा विक्रम मोडू शकतो. कारण या यादीतील बहुतेक खेळाडू निवृत्त झाले आहेत.