बहुजननामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या प्रत्येक घोषणेकडे देशभरातील प्रत्येकाचे लक्ष लागलेले असते. स्वतंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर भाषण करताना त्यांनी पुन्हा एक घोषणा केली आहे. देशातील जनतेचे राहणीमान उंचावण्याच्या उद्देशाने दोन कोटी घरे बांधण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
देशभरातील गावात बेघरांसाठी दोन कोटी घरे, आरोग्य केंद्रे, चिकित्सा महाविद्यालये उभारण्याची महत्वपुर्ण लक्ष्य त्यांनी ठेवले आहे. शिवाय १५ कोटी घरात पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रोजगार निर्मितीसाठी ग्रामीण भागात सव्वा लाख किलोमीटर रस्ते, खेड्याच ब्रॉडबॅंड कनेक्टिविटी ऑप्टीकल फायबर नेटवर्क जोडण्यात येतील. पन्नास हजाराहून अधिक नव्या स्टार्टअप योजना आमंलात आणल्या जाणार आहेत.
योजनांची माहिती देताना ते म्हणाले, सामान्य जनतेचे जीवन सुखकर व्हावे आणि त्याच्या जीवनात सरकारची दखल कमीत कमी असेल असे वातावरण देशात निर्माण करण्यात येईल. त्याच्या अडचणीच्या वेळी त्यांना सरकारची मदत मिळेल. देशाचा विकास हळूहळू नाही तर तो जलद झाला पाहिजे. त्यासाठी वाट बघत बसायची नाही. भारताला विकासासाठी महत्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि त्यांची अंमलबजावणीही लवकरात लवकर करावी लागणार आहे.