बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर महाराष्ट्रातील चार टप्यापैकी दोन टप्यातील मतदान उरकले असून येत्या २३ तारखेला तिसऱ्या टप्यातील मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजित निंबाळकर यांचा मराठा क्रांती मोर्चा कडून निषेध करण्यात आला आहे. तसंच लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान न करण्याचा आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांकडून करण्यात आलं आहे.
मराठा क्रांती मोर्च्याच्या काळात १४०० पेक्षा अधिक युवकांवर दाखल केलेल्या केसेस मागे घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. या आश्वासनावर प्रश्न विचारल्याने चिडून मला सभेतून ओढून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिली,” असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी केला आहे.
रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपमध्ये घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी खेळी खेळत संजय शिंदे यांना आपल्याकडे खेचले आणि उमेदवारी दिली.शरद पवार यांच्या या खेळीमुळे भाजपसमोर उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर भाजपने काँग्रेसमधून आलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. या पार्श्वभूमीवर माढ्यात आता जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.दरम्यान शरद पवार माढयातून लढणार होते पण त्यांनी माघार घेतल्यामुळे ते भरपूर ट्रोल झाले होते . त्यानंतर त्यांनी संजय शिंदे यांना उमेदवारी दिली .