बहुजननामा ऑनलाइन – शिवसैनिकांकडून माजी नौदल अधिकार्याला झालेली मारहाण आणि कंगना प्रकरणावरुन खासदार चिराग पासवान यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या व्यंगचित्र वादानंतर शिवसैनिकांकडून माजी नौदल अधिकार्याला झालेली मारहाण तसंच कंगना प्रकरणावरुन चिराग पासवान यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीआधी राजकारण जोरदार तापले आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण आणि कंगना प्रकरणावरुन राजकीय पक्षांनी आपापल्या पोळ्या भाजण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही मुद्द्यावर आता लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली आहे. ज्याप्रकारे उत्तर भारतीयांना टार्गेट केले जात आहे. कंगनाने प्रश्न विचारले म्हणून ज्याप्रकारे तिचेकार्यालय तोडण्यात आले. त्याशिवाय फक्त व्यंगचित्र फॉरवर्ड केले म्हणून माजी नौदल अधिकार्याला मारहाण करण्यात आली, असे वातावरण कायम राहिले तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याशिवाय दुसरा पर्याय आहे. लोकांमध्ये सुरक्षेची भावना नसेल, लोकांमध्ये भीतीचे वातावरण असेल आणि सरकारला लोक घाबरतील तर राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.