मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. 1 जलैपासून सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या पगारात 4 ते 5 टक्के वाढ होऊ शकते. कोणत्या कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढेल हे त्याच्या पदावर अवलंबून आहे. असे असले तरी ही वाढ जर 4 टक्के झाली तर, कर्मचाऱ्यांचा पगार 720 रुपयांपासून 10 हजार प्रतिमहिना एवढा वाढणार आहे.
सध्या केंद्र सरकारचा डीए 12 टक्के आहे. यात जर 4 टक्के वाढ झाली तर हा 16 टक्के होईल. दरम्यान Consumer Price Index- AICPIचा डेटा येईल तेव्हा डीए नेमका किती वाढेल याची माहिती मिळेल. याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एका पातळीवर वाढतो. ही वाढ झाल्यानंतर लेव्हल 1 पासून ते लेव्हल 18 पर्यंतच्या अधिकाऱ्यांचं वेतन सारख्या पातळीनं वाढेल.
7 व्या वेतन आयोगाचा फायदा
लेव्हल 1 हा सुरुवातीचा स्तर आहे तर लेव्हल 18 हा सर्वोत्तम स्तर आहे. 7 व्या वेतन आयोगामुळे लेव्हल 1 स्तरातील अधिकाऱ्यांचा पगार 18 हजार रुपये आहे तर लेव्हल 18 च्या अधिकाऱ्यांचा पगार हा 2.5 लाख प्रति महिना आहे.
महागाई भत्ता नेमका आहे तरी काय ?
महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग(COL) आणि कंझ्युमर प्राईस इंडेक्स(CPI)शी संबंधित असतो. या त्यांच्या वेतानाचाच एक भाग आहे. कॉस्ट ऑफ लिव्हिंग (COL) आणि कंझ्युमर प्राइस इंडेक्स (CPI) यांचे वेळोवेळी विश्लेषण केले जाते. कर्माचाऱ्यांच्या बेसिक पेच्या परसेंटेजवर हा भत्ता मोजला जातो. इतकेच नाही तर निवृत्तीधारकांनाही 12 टक्के डीए मिळतो.
केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेऊन अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे भ्रष्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यांना आळा बसणार आहे. अशा कर्माचाऱ्यांना सरकार सक्तीची निवृत्ती देत घरचा रस्ता दाखवणार आहे. ही प्रकिया राबवत असताना कोणत्याही कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
सरकारने हा निर्णय घेण्याचे कारण असे की, प्रशासनात गतिमानता यावी तसेच निर्णयांची अंमलबजावणी वेगाने व्हावी. सरकारी सेवेत आल्यानंतर कायद्याचं संरक्षण मिळाल्याने अधिकारी निर्ढावतात अशी नेहमीच ओरड असते.