औरंगाबाद बहुजननामा ऑनलाईन – मराठा क्रांती मोर्चाने ९ ऑगस्टपासून राज्य क्रांती मोर्चाने एल्गार पुकारला आहे. कोपर्डी घटनेतील आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करावी , मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावेत यांसह अनेक मागण्यांसाठी ९ ऑगस्ट क्रांतीदिनापासून मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यभर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रविंद्र काळे यांनी पत्रकार परिषदेत केली.
औरंगाबाद येथील यशवंत कला महाविद्यालयात बुधवारी मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला उपस्थित असलेल्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या नावाचा गैरवापर केला जाणार नाही अशी शपथ घेतली. त्यानंतर विविध मुद्द्यांवर चर्चा कऱण्यात आली.
कोपर्डीतील पिडीतेवर अत्याचार करून निर्घृण खून करण्यात आला. याप्रकऱणी आरोपींनी फाशीच्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. या अपीलावर म्हणणे मांडण्यासाठी राज्य सरकारने अद्यापही वकिल दिला नाही. तर त्यामुळे या याचिकेवरील सुनावणी पार पडली नाही. परिणामी या शिक्षेची अंमलबजावणीदेखील होऊ शकली नाही. ती लांबणीवर पडली आहे. त्यासोबतच मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर सरकारने चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमिती नेमली आहे. ती कोणतेही काम करताना दिसत नाही. त्यासोबतच मराठा समाजातील ४३ तरुणांनी आत्मबलिदान दिले. ते केवळ सरकारने लवकर निर्णय न घेतल्यानेच. त्यासोबतच संतप्त झालेल्या बांधवांनी हिंसक आंदोलन केले. त्यावेळी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. ते सरसकट मागे घेतले जावेत अशी मागणी अनेक दिवसांपासून सुरु आहे. परंतु सरकार कोणतेही निर्णय याबाबत घेत नाही. तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला वाढीव निधी द्यावा. आणि अशा अनेक मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा निर्णय या बैठकित झाला.
राज्यभर गनिमी कावा पद्धतीने ठिय्या आंदोलनं
या सर्व मागण्या ८ ऑगस्टपर्यंत राज्य सरकारने मान्य न केल्यास ९ ऑगस्टपासून गनिमी कावा पद्धतीने राज्यभर ठिय्या आंदोलनं करण्यात येणार आहेत. तर १५ ऑगस्टपासून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती रविंद्र काळे पाटील यांनी दिली. यावेळी अशोक मोरे, सुनील कोटकर, किशोर चव्हाण, सचिन मिसाळ, संजय सावंत, अशोक मोरे, दिलीप झगरे, विशाल पवार, कल्याण शिंदे, विशाल पवार, मुकशे सोनवणे, रघुनाथ खेडेकर, दिगंबर गायके, योगेश शेळके, निलेश ढवळे, कल्याण शिंदे, ज्ञानेश्वर गायकवाड, अनुराधा ठोंबरे इत्यादी उपस्थित होते.