मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ॲड. प्रकाश आंबेडकरांनी आरएसएसला कायद्याच्या चौकटीत कसे आणायचे याचा मसुदा द्यावा. महाराष्ट्रातील आघाडीच्या सर्व नेत्यांच्या सह्या आणण्याची जबाबदारी मी घेतो. त्या मसुद्यानुसार सह्या झाल्या नाही तर मी राजकारण सोडून देईन, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमधून व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रातील महाआघाडीतील नेत्यांच्या सह्या आणण्याची जवाबदारी मी घेतो, तुम्ही दिलेल्या मसुद्यावर सह्या झाल्या नाही तर मी राजकारण सोडेन पण तुम्ही आघाडीत बिघाडी करु नका, असेही डॉ. आव्हाड यांनी ट्वीटमध्ये सांगितले आहेत.
काँग्रेस धर्मनिरपेक्ष व्हावे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणावे आणल्यास आम्ही महाआघाडीबाबत विचार करू, काँग्रेसला आणल्याशिवाय पर्याय नाही, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. त्याबाबत डॉ. आव्हाड यांनी ट्वीट केले आहे.
डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमधून प्रकाश आंबेडकरांनी आघाडीत बिघाडी करु नका, असे आव्हान केले आहे. त्याला आंबेडकर काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रकाश आंबेडकरजी आर एस एस ला कायद्याच्या चौकटीत कसे आणायचे याचा मसुदा आपण द्या महाराष्ट्रातील आघाडीच्या सर्व नेत्यांच्या सह्या आणण्याची जबाबदारी मी घेतो. तुम्ही दिलेल्या मसुद्यावर जर सह्या झाल्या नाहीत तर मी राजकारण सोडून देईन पण आघाडीत बिघाडी करू नका.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 24, 2019