लखनौ : बहुजननामा ऑनलाईन – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दशतवादी हल्यानंतर भारतीय जवानांनी प्रतिहल्ला केला. परंतु उत्तर प्रदेशातील समाजवादी नेते आर. जी. यादव यांनी मोठे भाष्य केल्याने खळबळ उडाली आहे. या हल्ल्याची चौकशी केल्यास बड्या नेत्यांची पोलखोल होईल. असा गंबीर आरोप त्यांनी केला आहे.
यादव म्हणाले कि भाजप सरकारने लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन मतांसाठी पुलवामा हल्ला घडवून आणण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय अर्धसैनिक दले या सरकारवर नाराज आहेत. जवानांचा इतका मोठा ताफा घेऊन जाताना कसलीच तपासणी झाली नाही. या जवानांना साध्य बस मधून घेऊन जाण्यात येत होते.यावरून असे दिसते कि हा सगळा कट होता. असा गंभीर आरोप आर. जी. यादव केला.
या कटात कोण सामील होत हे मी आत्ता सांगू इच्छित नाही.परंतु सरकार बदल्यावर याची चौकशी होईल तेव्हा बड्या नेत्यांची पोलखोल होईल. असे यादव यांनी म्हटले आहे.निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा पुलवामा हल्ल्यावरुन राजकारणाला सुरुवात झाल्याने या विधानावर सत्ताधाऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. https://twitter.com/ ANINewsUP/status/ 1108634261626601473