पुणे : बहुजननामा ऑनलाईन – वादग्रस्त मुद्द्यांच्या पुढे जाऊन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचे महत्त्व आहे. गांधीजी व आंबेडकर यांच्या संवादाच्या शक्यता नष्ट करण्याचे काम काही संघटनांनी मध्यंतरी केले असले तरी ते अद्वैत होते व परस्पर पुरक होते. असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी केले. प्रा. सुभाष कांबळे यांनी लिहिलेल्या “विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर “ग्रंथावर ” आधारित जाहिर परिसरंवादात ते बोलत होते. रयत सेवा झोपडी संघटना, पुणे शहर, मिलिंद, मोफत वाचनालय व ग्रंथालय, बोपोडी व जिव्हाळा परिवार यांच्या वतीने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, युक्रांदचे डॉ. कुमार सप्तर्षी, हे प्रमुख अतिथी तर अध्यक्ष म्हणून प्रा. के. व्ही. सोनकांबळे, पत्रकार दत्ता सुरवसे, यशपाल सोनकांबळे, युक्रांदचे कार्यवाह संदिप बर्वे, जांबवंत मनोहर, गोरख थोरात, के.एच. सुर्यवंशी अंबादास कांबळे, जी. एस गायकवाड़, प्रा. ब्राम्हणे, जयश्री कांबळे, व्ही. एम. माने आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. सप्तर्षी म्हणाले की, सद्यपरिस्थितीत चरित्राचे संदर्भ माझ्यासाठी खुप महत्त्वाचे वाटतात. मानसिक प्रगतीसाठी जात सोडली पाहिजे. सध्याचे सरकार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानविरोधी आहे. या सरकारला सत्तेवरून दूर केले पाहिजे.
तर परिसंवादाचे अध्यक्ष के. व्ही सोनकांबळे म्हणाले की, चळवळीतील डॉक्यूमेंटरी या चरित्राचे मुख्य स्त्रोत आहेत. बाबासाहेब म्हणाले होते की जात ही सद्गुण निर्मितीतील सर्वात मोठा अडसर आहे.
प्रा. सुभाष कांबळे यांनी विश्वरत्न या चरित्राचा मुख्य उद्देश्य प्रस्तूत केला. त्यासोबतच ज्येष्ठ नेते जॉर्ज फर्नांडीस यांच्या आठवणींना उजाळा यावेळी देणयात आला आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार दत्ता सुरवसे यांनी केले तर आभार प्रदर्शन यशपाल सोनकांबळे यांनी केले.