कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय घडामोडीत आंबेडकरी चळवळीकडे अथवा रिपब्लिकन पक्षाकडे ताकद असूनही दुर्लक्षित करण्याचे अथवा गृहीत न धरण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न चालू आहेत. युती व काँग्रेस आघाडीच्या चर्चेमध्ये रिपब्लिकन नेत्यांना बाजूला ठेवले जात आहे. पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांना दोन्हीकडून आपल्याच पक्षाच्या चिन्हावर लढण्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षच संपविण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप रिपाइं (गवई) गटाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विलासराव देशमुख यांनी केला आहे.
कोल्हापुरात रिपाइंच्या गवई गटातील कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा झाला. त्यात प्रा. देशमुख बोलत होते. दि. २३ फेब्रुवारी रोजी डॉ. राजेंद्र गवई यांचा जिल्हादौरा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. प्रारंभी पांडुरंग कांबळे यांनी स्वागत केले, तर संयोजन शहराध्यक्ष बाजीराव गायकवाड यांनी केले. मेळाव्यास पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष भाऊसाहेब काळे, जिल्हा सरचिटणीस सज्जन कांबळे, बबन शिंदे, भीमराव कांबळे, एम. आर. कांबळे, अनिल धनवडे, शोभा कुमठेकर, सतीश माने, रमेश धनवडे, आदी उपस्थित होते.