मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद मतदारसंघात ‘खान पाहिजे कि बाण ‘अशा घोषणा सुरु होत्या आणि जातीचं राजकारण करत विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली पण वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद हा शिवसेनेचा गड असणाऱ्या मतदार संघात सर्व अंदाच खोटे ठरवत चंद्रकांत खैरे यांना पराभवाची धूळ चाखण्यास भाग पाडले.
शिवसेनेचा हा गड तब्बल २० वर्षांनी खालसा झाला असून शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे.खैरेंनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी ‘मातोश्री’वर भेट घेतली. आपला पराभव का आणि कसा झाला, याचा अहवाल दिला’मातोश्री’वरील बैठक संपल्यावर चंद्रकांत खैरे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘विजयी उमेदवार इम्तियाज जलील आणि विरोधकांना सोडणार नाही,’ असे खैरेंनी सांगितले आहे.
या खैरेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर औरंगाबाद नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील काय प्रत्युत्तर देतात, हे पाहाणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.