बहुजननामा ऑनलाइन टीम – वास्तुविशारद अन्वय नाईक आणि त्यांचे कुटुंबीय अक्षता, आज्ञा आणि रश्मी उद्धव ठाकरे(Thackeray ), मनीषा रवींद्र वायकर यांच्यात अनेक जमीन व्यवहार (land-transactions-between-
वायकर आणि ठाकरे कुटुंबाने रायगडमध्ये जमीन खरेदी केली. त्यांनी आतापर्यंत असे किती व्यवहार केले आहेत? त्यांचे संयुक्तपणे किती व्यवसाय आहेत?, असे सवाल सोमय्यांनी उपस्थित केले. ठाकरे-वायकर यांनी नाईक कुटुंबाशी केलेला व्यवहार जुना असताना फडणवीस सरकार असताना त्याबद्दलच्या चौकशीची मागणी का केली नाही? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, त्यावर स्थानिक लोक जमीन व्यवहारांची माहिती देत नाहीत. माझी सासूरवाडी रायगडमध्ये आहे. तिथे गेलो असताना व्यवहाराची माहिती मला मिळाली, असे उत्तर सोमय्यांनी दिले आहे.
भागीदारीत जमीन खरेदीस मनाई आहे का, वायकर यांच्याकडून सोमय्यांना प्रत्युत्तर
सोमय्यांनी केलेल्या आरोपांना शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोणी कोणाकडून जमीन खरेदी करू नये का, असा सवाल त्यांनी उपस्थित केले. ‘रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन खरेदी केली. त्याची माहिती आम्ही आयकर विभागाला, निवडणूक आयोगाला दिली. पार्टनरशिपमध्ये जमीन खरेदी करायला मनाई आहे का?’ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला आहे.