नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तेलंगणा राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्यांना १ एप्रिलपासून ३० टक्क्यांची पगारवाढ करण्यात आली आहे. यावरून तेलंगणातील तब्बल ९ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. केवळ पगारवाढच नाही तर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कर्मचाऱ्यांना आणखी एक भेट देत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सोमवारी विधानसभेत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
CM Sri KCR announced the details of 11th pay revision in the Legislative Assembly. A total of 9,17,797 Govt. employees of all categories, teachers, pensioners to get 30% fitment from 1st April, 2021. Retirement age increased to 61 years. Decided to release PRC-related arrears. pic.twitter.com/Mhm2hHutMS
— Telangana CMO (@TelanganaCMO) March 22, 2021
या निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय हे आता ५८ वरुन ६१ केलं आहे. निवृत्त IAS अधिकारी सी. आर. बिस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली २०१८ रोजी तयार करण्यात आलेल्या अकरावा वेतन पुनरीक्षण आयोगाच्या सूचनांवर विधानसभेत याबाबत चर्चा केली गेली. यापूर्वी तेलंगणा राज्य शासनाने २०१४ रोजी पे रिव्हिजनची घोषणा केली होती. २०१४ रोजी या शासनाने सरकारी कर्मचाऱ्याचं वेतन ४३ टक्के वाढवण्याचे जाहीर केलं होतं. या कारणाने कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. तसेच, पगारवाढीची मागणी ही मागील काही महिन्यांपासून वारंवार होत असताना, बिस्वाल आयोगाने वेतन वाढीची शिफारस ही तेलंगणा राज्य शासनाकडे केली होती. कोरोना पार्श्वभूमीत सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ शक्य झाली नाही. राज्य शासनाचीही आर्थिक स्थिती मंदावल्याने हा निर्णय घेण्यास अवधी लागला. आता परिस्थिती पूर्वापादावर काही प्रमाणात सुधारल्यानंतर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ करण्याचे जाहीर केले. हा पगारवाढ सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. निवृत्तीनंतर मिळणाऱ्या ग्रॅच्युटीची रक्कम देखील १२ लाखांवरून १६ लाख करण्यात आली.
दरम्यान, २०१८ साली तेलंगणामध्ये झालेल्या निवडणुकीवेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा पक्ष हा निवृत्तीच्या वयात बदल करणार आणि त्याचा लाभ हा अनेक लाखो कर्मचाऱ्यांना होणार असे जाहीर केले होते. तर तेलंगणामध्ये ९.१७ लाख सरकारी कर्मचारी आहे. ज्यांना आता ३० टक्के पगारवाढ मिळणार आहे. आतापर्यंत पगारवाढ ही केवळ सामान्य कर्मचाऱ्यांना मिळायची. पण आता कॉन्ट्रॅक्ट आणि आऊटसोर्सिंगवर काम करणाऱे कर्मचाऱी, होमगार्ड्स, अंगणवाडी कार्यकर्ते, आशा कार्यकर्त्यांना देखील याचा लाभ मिळणार असल्याचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतला असल्याचे समजते.