मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. गेल्या तीन चार दिवसापासून आरोप प्रत्यारोपच्या झडणाऱ्या फैऱ्यांमुळे महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. या सर्व घडामोडीचे पडसाद संसदेतही उमटले. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी भाजपसह इतरही काही पक्षाच्या खासदारांनी केली. या दरम्यान, परमबीर सिंगांनी केलेल्या आरोपांची सारवासारव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेऊन, फेब्रुवारी महिन्यात बराच काळ अनिल देशमुख रुग्णालयात आणि नंतर आपल्या घरी क्वारंटाइन होते, असा दावा केला होता. मात्र, आता नवनव्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे फेब्रुवारीमध्ये अनिल देशमुख यांनी चारटर्ड विमानाने प्रवास केल्याचे दिसते. मात्र यानंतर सोशल मिडियावर एक व्हिडीओ शेअर करत अनिल देशमुखांनी स्पष्टीकरण दिले आहे.
चार्टर्ड विमानाच्या एका कागद्पत्रावरून १५ फेब्रुवारी, २०२१ रोजी नागपूर-मुंबई असा अनिल देशमुखांनी विमानातून प्रवास केला होता. देशमुख यांच्यासह ८ जणांनी हा प्रवास केला असून त्यात पूजा देशमुख यांचाही समावेश आहे. यामुळे पुन्हा एकदा गृहमंत्री देशमुख अडचणीत आले आहेत.
अनिल देशमुखांनी व्हिडिओ जारी करत दिलं स्पष्टिकरण –
विमान प्रवास प्रकरणावरून देशमुखांनी एक व्हिडीओ जारी कर यावर स्पष्टकरण दिल आहे. ते म्हणाले की, माझ्यावर काही दिवसापासून खोटे आरोप केले जात आहे. माध्यमातूनही चुकीच्या बातम्या दिल्या जात आहे. ५ फेब्रुवारीला मला कोरोनाची लागण झाली. त्यावेळी मी नागपूर येथेच होतो. त्यानंतर मी रुग्णालयात भरती झालो. रुग्णालयातुन मला १५ फेब्रुवारीला डिस्चार्ज मिळाला. तद्नंतर मी खासगी विमानाने नागपूरहून लगेच मुंबईला होम क्वारंटाइनसाठी आलो. यासंपूर्ण काळात मी व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमाने बैठकांमध्ये भाग घेत होतो. या शिवाय, जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी गृह मंत्री म्हणून आपण संपूर्ण राज्याचा दौरा करत होतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 23, 2021
काय म्हणाले होते शरद पवार –
परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये अनेक खलबत झाली. राज्यातील परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते कमलनाथ आणि शरद पवार यांनी चर्चा केली. त्यानंतर अनिल देशमुख यांना अभय देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी स्वाद साधला ते म्हणाले, फेब्रुवारीच्या मध्यात देशमुखांकडून वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे परमबीर सिंग यांनी सांगितले; परंतु माझ्याकडे जी कागदपत्रे उपलब्ध आहेत त्यानुसार ५ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत देशमुख हे नागपूरमधील रुग्णालयात उपचार घेत होते. त्या रुग्णालयाने प्रमाणपत्र दिले आहे. त्यानंतर त्यांना घरीच विलगीकरणात राहण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता त्यानुसार १५ फेब्रुवारीला रुग्णालयातून सुटी मिळाली आणि ते घरीच विलगीकरणात होते. २७ फेब्रुवारीपर्यंत त्यांना घरीच आराम करण्याचा सल्ला होता. त्यामुळे सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची या काळात शक्यता नाही. असेही पवार म्हणाले.