अहमदनगर : बहुजननामा ऑनलाइन – दुष्काळ असताना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर टँकर घोटाळा झाला असून चारा छावण्यातही घोटाळा झाला आहे. तसेच राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवली, त्यातही घोटाळा झाला असा घणाघाती आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ हे पहिल्यांदाच नगरला आले असता त्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजनाची बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये बोलताना रोहित पवार यांनी भाजप सरकारवर आरोप केले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील रस्ते, शाळा या विषयावर मोठा निधी मागत दुष्काळात टँकर छावणी आणि दिलीप पवार योजनेअंतर्गत झालेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
राष्ट्रवादीच्या बैठकीत नवीन सदस्यांनी प्रामुख्याने जलयुक्त शिवार, टँकर घोटाळा आणि चार छावण्या या तीनही विषयांची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तो प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येईल, याची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याची माहिती त्यावेळी हसन मुश्रीफ यांनी दिली.