मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील दीड डझन पदाधिका-यांनी सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेत प्रवेश केला आहे. एकदम येवढ्या संख्येने पदाधिका-यांनी स्वाभिमानीचा त्याग केल्याने संघटनेला खिंडार पडले आहे.
रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितमध्ये गुरुवारी स्वाभिमानीचे पदाधिका-यांनी रयत क्रांती संघटनेत प्रवेश केला. रयक क्रांती संघटनेमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिका-यांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या सदस्यांसोबत जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा संघटक, तालुका अध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष तसेच सदस्यांचा समावेश आहे.
राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक पगार, जिल्हा उपाध्यक्ष डोंगर आण्णा पवार, जिल्हा संघटक भिकाबापु धोंडगे, जिल्हा संघटक केरादादा पगार, जिल्हा संघटक साहेबराव पाटील (अहिरे), जिल्हा संघटक संदीप कापडणीस, जिल्हा संघटक रवींद्र पगार, कळवण तालुका अध्यक्ष रामकृष्ण जाधव, सटाणा तालुका अध्यक्ष सुभाष अहिरे, देवळा तालुका अध्यक्ष रवींद्र शेवाळे, युवा उपाध्यक्ष पंडूरिनाथ अहिरे, तालुका युवा उपाध्यक्ष भाऊसाहेब पगार. तालुका युवा अध्यक्ष युवराज देवरे, तालुका उपाध्यक्ष दादाजी पगार, तालुका युवा उपाध्यक्ष विरेंद्र पगार, तालुका युवा उपाध्यक्ष चंद्रकांत पवार, तालुका युवा उपाध्यक्ष युवराज पगार या सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रयतक्रांती संघटनेमध्ये प्रवेश केला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे, नाशिक जिल्हाध्यक्ष विशाल पवार, कार्यकारणी सदस्य अजय बागल हे उपस्थित होते
एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने पदाधिका-यांनी स्वाभिमानीचा त्याग केल्याने संघटनेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.