औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – मराठा आरक्षणासाठी समाजाने केलेला त्याग आणि संघर्षामुळे राज्यात मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधील आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला परंतु केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण लागू होणे गरजेचे आहे. अशी मागणी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाची व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून तसा कायदा करण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी मागणी करणार असल्याचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाला १२ टक्के नोकरीत, १३ टक्के शिक्षणात आरक्षणाचा निकाल दिला.या संदर्भात कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना विचारले असता ते म्हणाले कि, मी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मी राजीनामा दिला, त्यानंतर समाजातील विविध घटकांकडून आरक्षणासाठी काहीना काही पावले उचलली जात होती.
मराठा समाजाने शांततामय मार्गाने काढेलेले राज्यभरातील मोर्चे, तरुणांनी दिलेले बलिदान, न्यायालयीन लढा देणारे समाज बांधव या सगळ्यांच्या संघर्षाचा विजय म्हणून या निर्णयाकडे मी पाहतो. परंतु आता केंद्राच्या युपीएससीअतंर्गत दिल्या जाणाऱ्या नोकऱ्यांमध्ये देखील हे आरक्षण लागू होणे गरजेचे आहे. एक लढाई संपली असली तरी दुसरी लढाई अजून बाकी आहे.केंद्रात देखील मराठा आरक्षण टिकले पाहिजे आणि त्यासाठी लोकसभेत कायदा केला तरच त्याची व्याप्ती वाढेल. राज्याप्रमाणेच केंद्र सरकारमध्ये देखील मराठा आरक्षण कायदा पास करून घ्यावा. आजच्या निकालाबद्दल मी न्याय व्यवस्थेचेही आभार मानतो असेही हर्षवर्धन जाधव म्हणाले.