नवी दिल्ली बहुजननामा : दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे काल मंगळवारी रात्री एम्स रुग्णालयात दुःखद निधन झाले. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी प्राण सोडले. हृदय विकाराचा झटका येताच त्यांना दिल्ली च्य एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या खूप प्रयात्नांनतरही सुषमा स्वराज याना वाचवू न शकल्याने डॉक्टरांना अश्रू अनावर झाले.
डॉक्टरांच्या ७० मिनिटांच्या प्रयत्नांनंतरही सुषमा यांचा श्वास परत आला नाही. जवळपास तासभर सीपीआर , हार्ट पंप तसेच शॉक सारख्या अनेक प्रक्रियांचा वापर करण्यात आला , परंतु सुषमा यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने डॉक्टरांनी व्हेंटिलेटर चा सपोर्ट दिला. एवढे करून देखील सुषमा याना वाचवू न शकल्याने, डॉक्टरांच्या टीमला आपल्या भावना अनावर झाल्या, आणि त्यांनी बाहेर हताश होऊन अश्रू ढाळले.
डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ९. ३५ ला सुषमा याना एम्स मध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयाची संपूर्ण टीम यासाठी अलर्ट होती , त्यांना ऍम्ब्युलन्स मधून काढते वेळी देखील डॉक्टर सीपीआर सोबत उपस्थित होते. सुषमा यांना हार्ट अटॅक आल्याचे डॉक्टरांना लगेच समजले , त्यांनी लगेच सीपीआर ची ट्रीटमेंट सुरु केली परंतु काहीच रिस्पॉन्स न मिळाल्याने त्यांनी सुषमा याना शॉक देण्यास सुरुवात केली. डॉ. विके बहल आणि त्यांच्या टीम ने खूप प्रयत्न करूनही काहीच प्रतिसाद नसल्याने सुषमा यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले. त्यांनतर सुषमा यांनी अखेरचा श्वास घेतला.