नवी दिल्ली बहुजननामा : माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या कर्तबगार नेत्या सुषमा स्वराज यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी काल मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुषमा यांच्या निधनाच्या काही तासांपूर्वीच भारताचे नामांकित वकील हरीश साळवे यांच्या सोबत, तुमचे १ रुपये मानधन घेऊन जावा , या संदर्भात बोलणे झाले होते. इंटरनॅशनल कोर्टात कुलभूषण जाधव मुद्द्यावर भारताच्या बाजूने लढणारे भारताचे टॉप वकील हरीश साळवे यांनी या केस प्रकरणी अवघे १ रुपये मानधन घेतले होते.
हरीश साळवे यांनी एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले कि , सुषमा यांच्या निधनाच्या काही तासांपूर्वीच त्यांचे आपल्याशी बोलणे झाले होते. आपले एक रुपये मानधन घेऊन जाण्यासाठी त्यांनी बोलवले होते. ८. ५० वाजता त्या माझ्याशी बोलत होत्या. कुलभूषण केस बाबत आम्ही भावनिक होतो. त्यांनी मला भेटायला सांगितले. तुमच्या विजयाचे १ रुपये मानधन तुम्ही घेऊन जाऊ शकता. मी सुद्धा त्यांना येऊन माझे अमूल्य मानधन घेऊन जाईल असे सांगितले. आज सायंकाळी ६ वाजता त्यांनी मला बोलावले होते.
मागील महिन्यात कुलभूषण जाधव केस प्रकरणी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस ने भारताच्या बाजूने निकाल देऊन , पाकिस्तान ला विचार करण्यास भाग पाडले होते. कुलभूषण यांची फाशीची शिक्षा अमान्य करत , पाकिस्तान ला चांगलेच सुनावले होते. याच केस प्रकरणी हरीश साळवे यांनी अवघे १ रुपये मानधन घेतले.