नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – भाजप सरकारने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक वरून देशात चांगलेच वातावरण तापले होते त्यावर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लबोल केला आहे . कॉंग्रेसच्या कार्यकाळातला सर्जिकल स्ट्राईकचा दावा खोटा आहे, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.एका माहिती अधिकारात २०१६ पूर्वी कुठलाच सर्जिकल स्ट्राईक झाला नसल्याचे उघड झाले असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे .काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसने त्यांच्या काळात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची एक यादी जाहीर केली होती. तसेच राजकीय फायदा मिळवण्यासाठी सैनिक कारवाईंचा आपण वापर केला नसल्याचे पक्षाने म्हटले होते. कॉंग्रेस आधी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत होती आणि आता सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा करत आहे.
माहिती अधिकारात एक माहिती समोर आली आहे त्यात एका सैन्याने सांगितले की, २०१६ पूर्वी कुठलेच सर्जिकल स्ट्राईक झाले नव्हते. कॉंग्रेसचे अजून एक खोटे समोर आले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, UPA सरकारच्या काळात अनेक सर्जिकल स्ट्राईक केले गेले. पण त्याचा कधी राजकीय फायदा घेतला नसल्याचे मनमोहन सिंग म्हणाले होते त्यानंतर भाजप आणि कॉंग्रेसमध्ये या मुद्द्यावरून राजकीय युद्ध सुरु झालं होते .