मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – हिंगोली येथून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कौटुंबिक वादातून जेवणात मुंग्या मारण्याचे औषध घालून तीन मुलांसह मातेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. आजम कॉलनी भागातील अनिता जगताप यांचे आपल्या पतीशी नेहमीच खटके उडत होते.
बुधवारी रात्री उशिरा शहरातील आजम कॉलनी भागात ही घटना घडली. चौघांनाही वेळीच जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यामुळे चौघांचे प्राण वाचले आहेत. विषबाधा झालेल्यांमध्ये अनिता जगताप (वय,४०), वैष्णवी जगताप (१७), साईनाथ जगताप (१४) आणि अनिकेत जगताप (१२) यांचा समोवश आहे.
आर्थिक विवंचेनेमुळे हा वाद होत होता. अनिताने बुधवारी रात्री जेवणात मुंग्या मारण्याचा खडू जेवणात कालवला आणि त्यामुळे सर्वांनाच विषबाधा झाली. मग त्यांना उलट्याचा त्रास होत असल्याने शेजारील नागरिकांनी त्यांना एका खासगी रूग्णालयात दाखल केले आणि त्यांच्याकडील पैसे संपल्यामुळे त्यांना बुधवारी रात्री जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आणि चौघांचा जीव वाचला.