बहुजननाम ऑनलाईन टीम – शुक्रवारी कारगिलच्या युद्ध विजयाला २० वर्ष पूर्ण झाले. या युद्धात भारताने पाकिस्तानी जवानांना हरवून कारगिल आपल्या ताब्यात घेतले होते. या विजयला आज २० वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद भारतातील प्रत्येक नागरिक करत आहे. जाणून घेऊ पाकिस्तानानी याची कट कशी रचली होती. पाकिस्तानानी यासाठी १९८४ मध्ये कट रचला होता पण तो त्यांना १९९९ मध्ये करता आला.
पाकिस्तानचा नावाजलेला पत्रकार नजम सेठी यांनी याबाबद्दल माहिती एका चॅनलच्या मुलाखतीत दिले आहे. या कारगिल विजयावर भारतात अनेक पुस्तक लिहिले गेले मात्र पाकिस्तान मध्ये यावर अगदी कमी माहिती उपलब्ध आहे.
त्यांनी सांगितले की १९८४ मध्ये पाकिस्तानमध्ये जनरल जिया उल हक चा शासन होता. तेव्हा भारत ने सियाचीन च्या पर्वतांवर कब्जा केला होता. परंतु जिया उल हक ने देशात ही गोष्ट नाही सांगितली कारण यामुळे त्यांच्या विरोधात देशात राग निर्माण होईल अशी भीती त्यांच्या मनात होती.
परंतु तेव्हाच DGMO ने जिया उल हकला एक प्लॅन सांगितले आणि म्हणाले की आपण सियाचीन परत मिळवू शकतो. DGMO च्या मते भारताने ज्या पद्धतीने हिवाळ्यात ताबा मिळवला आहे त्याच पद्धतीने आपण येणाऱ्या हिवाळ्यात सियाचीन परत मिळवू . पण ही गोष्ट जिया उल हकला यांना पटली नाही आणि हा कट फसला.
यानंतर १९९९ मध्ये पाकिस्तान मध्ये परवेज मुशर्रफ आर्मीचे प्रमुख होते. त्यात त्यांचा एक ग्रुप होता. त्या ग्रुपला ‘गैंग ऑफ फॉर’ म्हणून ओळखले जायचे . या ग्रुप मध्ये परवेज मुशर्रफ सोबत जनरल अजीज, जनरल महमूद आणि ब्रिगेडियर जावेद हसन होते. या चार लोकांनी १९९८ मध्ये पुन्हा प्लॅन केला.
ऑक्टोबर १९९८ मध्ये यांनी प्लॅनला मंजुरी दिली. जानेवारी १९९९ मध्ये २०० लोकांना ट्रेनिंग देण्यात आले. पहिल्यांदा त्यांचं लक्ष होते की भारतातील १० पोस्ट ताब्यात घेणे. त्यानंतर मे नंतरचा सगळा प्रसंग आपल्याला ठाऊकच आहे.