बहुजनामा ऑनलाईन – बारामतीची पुणे जिल्हयातील दहशत संपवायची आहे. असे वक्तव्य राज्याचे सहकार मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे भाजप प्रभारी सुभाष देशमुख यांनी केले आहे. पक्षाच्या पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केलं.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले कि, बारामतीची पिंपरी चिंचवड मधील दहशत आता संपुष्टात आली आहे. आता फक्त बारामतीची पुणे जिल्ह्यात असणारी दहशत संपवायची आहे. यावेळी राज्यमंत्री बाळा भेगडे, प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार बाबुराव पाचारणे, प्रदेश सरचिटणीस उमा खापरे, रवी अनासपुरे आदी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले कि, पुणे ग्रामीणमध्ये भाजपाची ताकद कमी आहे. तिथे २१ पैकी भाजपचे फक्त ३ आमदार आहेत. तसेच जिल्हापरिषदेत ७५ पैकी केवळ ७ जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे पुणे ग्रामीण मधील भाजपाची ताकद वाढवणे. सध्या गरजेचे आहे. असेही ते म्हणाले आणि याप्रसंगी त्यांनी कार्यकर्त्याना विनंतीही केली कि, तुम्ही कष्ट करून पक्ष वाढवा.