मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाला १२ टक्के नोकरीत, १३ टक्के शिक्षणात आरक्षणाचा निकाल दिला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या निर्णयावर आनंद व्यक्त करत उच्च न्यायालयाचे आभार मानले. तसेच, मराठा समाजाचे अभिनंदन करताना, छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे विशेष आभार मानले. उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात जो निकाल दिला आहे ते आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. सभागृहाने केलेला कायदा न्यायालयात वैध असल्याचं ठरलं आहे.
उच्च न्यायालयाने मराठा समाजाला १२ टक्के नोकरीत, १३ टक्के शिक्षणात आरक्षणाचा निकाल दिला.राज्य सरकारने १६ टक्के आरक्षण दिलं होतं पण ते न्यायालयाने नाकारून १२ टक्के नोकरीत आणि १३ टक्के शिक्षणात आरक्षण देण्याची शिफारस मागासवर्गीय आयोगाने दिली होती त्याप्रमाणे आरक्षण दिल आहे. आरक्षण देणारा कायदा आणण्यासाठी दोन्ही सभागृहाने साथ दिली त्याचे मी आभार मानतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच, विशेषत: छत्रपती संभाजीराजे यांचे मी आभार मानतो.
काय म्हणाले संभाजीराजे
मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर खा. छत्रपती संभाजीराजे म्हणाले कि, मराठा समाजाला प्रदीर्घ संघर्षानंतर मिळालेल्या आरक्षणाचा आनंद झाला आहे. मराठा आरक्षण टिकणं हे महत्वाचं होतं, किती टक्के हा दुसरा मुद्दा आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केलं पाहिजे, पदवीधरपर्यंत मोफत शिक्षण शक्य नाही. मग, बारावीपर्यंत मोफत शिक्षण द्यावं, अशी मागणी केली. राज्यसभेतही बारावीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा मुद्दा आज मी मांडला आहे, असे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी म्हटले आहे. मी मराठा समाजातील सर्व संबंधित घटक, संघटना आणि मराठा समाजाचे अभिनंदन करतो.
आरक्षण गेलं खड्ड्यात:
काही दिवसांपूर्वी खा. छत्रपती संभाजीराजे यांनी आरक्षण गेलं खड्ड्यात; पदवी पर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विध्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा!
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 21, 2019