मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आऱक्षण दिलं गेलं आहे. मराठा बांधवांनी दिलेल्या लढ्याचं हे यश आहे. मागावर्गीय आयोगाने दिलेल्या अहवालाची यात महत्वाची भूमिका आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण वैधतेच्या निर्णयावर विधानसभेत म्हणाले.
उच्च न्यायालयाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहिर करताच सभागृहात जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या.
काय म्हणाले मुख्यमंत्री
जो कायदा विधीमंडळाने पारित केला होता. तो वैध ठरविण्यात आला याचा मला आनंद वाटतो. सरकारला कायदा करण्याचा अधिकार आहे का ? असा आक्षेप घेतला होता. त्याला न्यायालयाने अधिकार असल्याचे सांगितले. त्यानंतर ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असू शकते का यावर अपवादात्मक परिस्थितीत ते असू शकते असे न्यायालयाने स्पष्ट केले. जो कायदा एकमताने तयार करण्यात आला होता. त्यामध्ये १६ टक्के आरक्षण देण्यात आले.
त्यावेळी मागासवर्गीय आयोगाने शिक्षणात १२ टक्के आणि नोकरीत १३ टक्के आरक्षण देण्याची मर्यादा घातली होती. तीच न्यायालयाने घातली आहे. असं असलं तरी १६ टक्के आरक्षण द्यायचे की नाही याचा निर्णय सरकारचा असेल असंही न्यायालयाने म्हटले आहे. असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.