लखनौ : बहुजननामा ऑनलाईन – २०१४ च्या लोकसभा निवडणूकित उत्तर प्रदेशामध्ये सपा-बसपाचे पानिपत झाल्याने २०१९ च्या लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी युती केली आहे. गोरखपूर मधून निवडून आलेले योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्याने ती जागा रिक्त झाल्याने गेल्या वर्षी पोटनिवडणूकीमध्ये समाजवादी पक्षाचे प्रवीण कुमार निशाद यांचा विजय झाला होता. त्यांनी आज केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
दोनच दिवसांपूर्वी प्रवीण कुमार निशाद यांनी सपा-बसपा आघाडीतून बाहेर पडल्याचे जाहीर केले असताणाचं. तेंव्हाच ते भाजपामध्ये जाणार असल्याचे बोलले जाऊ लागले होते. त्यांनी भाजप मध्ये जाणे हा ‘घाट्याचा सौदा’ असल्याची टीका सपाचे नेते अखिलेश यादव यांनी केली आहे. तसेच या पक्षांतरामागे आर्थिक देवाण घेवाण झाल्याचा आरोपही यादव यांनी केला आहे.
निषाद यांनी स्वतःच्याच नावानी ‘निशाद पार्टीची’ स्थापन केली होती. या पोटनिवडनूकीसाठी सपा आणि बसपाने निशाद यांना पाठिंबा दिला होता. त्यांना ही निवडणूक निशाद पार्टीच्या चिन्हावर लढायची होती. पण त्यांनी ही पोटनिवडणूक सपाच्या तिकीटावर लढवली होती. तेंव्हापासूनच सपा आणि निशाद पार्टीत मतभेद व्हायला लागले होते.
गोरखपूर जनतेने सपा-बसपा आघाडीला मतदान केले होते. प्रवीण कुमार निशाद यांना मतदान केले नव्हते. अशी टीकाही अखिलेश यादव यांनी केली.