नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लवकरच रेस्टॉरन्ट, हॉटेल अथवा एअरलाइनमध्ये चहाच्या घोटाची चव बदलणार आहे. कारण, सरकार ग्रामोद्योगअंतर्गत एकुण उलाढाल वाढविण्यासाठी मध वापराला चालना देणार आहे. केंद्रीय उद्योग मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले की, ग्रामीण उद्योग वाढविण्यासाठी ज्या महत्वाच्या उद्योगाला निवडण्यात आले आहे तो उद्योग मध बनविण्याचा आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत की, विमान, हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टसारख्या ठिकाणी चहा आणि कॉफीमध्ये साखरेच्या जागी मधाचा वापर केला जावा.
नितिन गडकरी यांनी म्हटले की, केंद्र सरकारचे लक्ष खादी आणि ग्रामोद्योगकडे आहे, कारण त्यांची एकुण उलाढाल 1 लाख कोटी रूपये वार्षिक पर्यंत वाढवायची आहे. भारतात 2018 मध्ये मधाचा एकुण व्यवसाय सुमारे 1,557.9 कोटी रूपये होता. 2024 पर्यंत तो 2,805.7 कोटी रूपये होण्याचा अंदाज आहे. मार्केट रिसर्च कंपनी आयमार्कच्या अहवालात हे सांगण्यात आले आहे.
ग्रामीण क्षेत्रात रोजगार वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न
गडकरी यांनी सांगितले की, अरुणांचल प्रदेश, मेघालय, त्रिपूरा, लेह, लद्दाख आणि काश्मीरच्या सुमारे 115 जिल्ह्यांना प्राधान्य दिले जाईल. ग्रामोद्योगची एकुण उलाढाल 75 हजार कोटी रूपये आहे आणि या वर्षी ती 1 लाख कोटी रूपये होईल. याद्वारे सरकार ग्रामीण भागातील रोजगाराची मागणीही पूर्ण करू शकणार आहे. या क्षेत्रात सरकार मध, मत्स्य पालन, बायोइंधन, बांबू आणि जंगल उत्पादनांना चालना देणार आहे.
एका कार्यक्रमात नितिन गडकरी यांनी श्रीनगरमध्ये लॉन्च होत असलेल्या खादी ग्रामोद्योगच्या प्रोजेक्टची माहिती दिली. ते म्हणाले, येथील महिला चरख्याच्या मदतीने रूमाल तयार करत आहेत. या महिलांनी तयार केलेल्या रूमालाची किंमत 50 रूपये आहे, जी ब्रँडेड रूमालाच्या तुलनेत खुपच स्वस्त आहे.