बहुजननामा ऑनलाइन टीम – सोमय्यांच्या(Somayya’s ) डोक्यावर परिणाम झाला आहे. शॉक दिल्याशिवाय त्यांचे बेताल वक्तव्य थांबणार नाहीत, असा इशारा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, कथित जमीन व्यवहारप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. याबाबत बोलताना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की या माणसाला केलेल्या उपकाराची जाणीव नाही. ठाकरे कुटुंबीयांच्या पायाजवळ बसून सोमय्या खासदार झाले. आज ते ठाकरे कुटुंबावरच टीका करत आहेत.
कथित जमीन व्यवहारप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या(Somayya’s ) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेलं आरोप
– दोन कोटी ५५ लाखांमध्ये जी जमीन अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली. ती ठाकरे सरकार, मुंबई महापालिका ९०० कोटीत घ्यायला निघाले. त्यासाठी ३४५ कोटी दिले. दहिसर भूखंडाचे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहे. याबाबत मुंबई लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
– अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाचे संबंध काय? नऊ सातबारे पुरावे म्हणून देतो, नाईक आणि रश्मी ठाकरे यांच्यात ३० जमिनीचे व्यवहार, रश्मी ठाकरेंनी जाहीर केलेल्या ४० जमीन व्यवहारांपैकी तब्बल ३० नाईक कुटुंबासोबत केले.
– रवींद्र वायकरांसोबत काय आर्थिक संबंध आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी किंवा रश्मी ठाकरे यांच्या प्रतिनिधींनी उत्तर द्यावे, वायकरांसोबत बिझनेस पार्टनरशीप आहे का? ठाकरे सरकारच्या सातबाऱ्यामध्ये संबंधित जमीन लागवड योग्य नसल्याचं लिहीलं आहे. नाईक आणि ठाकरे यांच्यात काय आर्थिक हितसंबंध आहेत, हे समजलं पाहिजे.