मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेना प्रमुख यांच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. सरकार स्थापन होऊन अनेक दिवस लोटले तरी अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. राष्ट्रवादीकडून मंत्रिमंडळाचा मार्ग मोकळा असता तरी काँग्रेस समोर पेच असून अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांना कोणतं मंत्रीपदं द्यायचा या संभ्रमात पक्ष आहे. यावर अशोक चव्हाणांनी स्वपक्षासह शिवसेनेलाही इशारा दिला आहे.
‘अनेक नेते पक्षात आहेत, जे चांगले काम करतात. ते निर्णय घेतात आणि असे व्हायला नको कि, आम्ही त्यामागे फरफटत चाललोय. आमचीही मते आहेत, निर्णय प्रक्रीयेत आमचाही आवाज महत्वाचा आहे. खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. तिन्ही पक्षांना वाटत आहे की एक विभाग त्यांच्याकडेच असावा. यावरून चर्चा सुरू आहे, ‘असे चव्हाण यांनी सांगितले.
तसेच, ‘अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रीमंडळात घ्यावे की नाही हा विषय नाही. पक्षाची फरफट होऊ नये यामुळे तेवढी काळजी पक्षाच्या नेतृत्वाला घ्यावी लागेल. ज्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये संतुलन बनेल. कॉमन मिनिमम प्रोग्रॅमची चौकट पाळणे गरजेचे आहे. जेव्हा आम्हाला वाटेल की चौकटीच्या बाहेर चाललेय तेव्हा आम्ही निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत, असा इशारा अशोक चव्हाणांनी दिला आहे. ते पुढे म्हणाले कि, पक्ष म्हणून जी जबाबदारी आहे ती नीट पार पाडली गेली पाहिजे, यामुळे जुने नवे अशी फळी नीट सांधली गेली पाहिजे, असा इशाराही त्यांनी स्वपक्षाला दिला आहे. आदर्शवर जे व्हायचे ते होईल, न्यायप्रविष्ट विषय आहे, पर्यावरणाचीही अडचण दूर झाली आहे, यामुळे त्याची मला चिंता नाही, असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.