दरम्यान, या पत्रातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात येऊन गुजराती माणूस मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जन्माला आलेल्या शिवसेनेला संपविण्याचे वाक्य बोलतो त्याला राणेंसह कार्यक्रमाला उपस्थित असलणारे मराठी जण टाळ्या वाजवतात. यासारखे मराठी माणसाच दुसरं दुर्दैव नाही अशी खंतही या पत्रात व्यक्त केली आहे.
काय म्हणाले होते अमित शहा…
सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना-भाजप यांच्यात बंद दाराआड झालेल्या चर्चेवर भाष्य केलं. ते म्हणाले, शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतेही आश्वासन दिलं नव्हतं. युतीला जनादेश असतानाही तो नाकारत शिवसेनेने तीन चाकी सरकार निर्माण केलं. मी बंद खोलीत नाही तर जाहीर शब्द देतो असे सांगत शहा यांनी सेनेला फटकारलं. शिवसेनेच्या मागार्ने आम्ही चाललो असतो तर शिवसेनाच शिल्लक राहिली नसती, असंही त्यांनी म्हंटल होत. सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेने जनादेशाचा अनादर करत तीन चाकी सरकार निर्माण केले आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मतं मागितली आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिवसेनेला त्यांनी तिलांजली दिली आहे. या तीन चाकी सरकारची तीन दिशांना तोंडं आहेत अशी टीकाही केली होती.