नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्र्यांनी संमती दिली तर २३ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे संकेत राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी आज दिले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी ते बोलत होते. तसेच शेतकरी कर्जमाफीसंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार आहे. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे.
अजित पवारांनी यावेळी नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात मत व्यक्त केलं आहे. या कायद्याबद्दल दोन मतप्रवाह आहेत. काहींचं म्हणणं आहे केंद्रानं मंजुरी दिल्यानंतर राज्याच्या मंजुरीची गरज नाही. तर दुसरीकडे राज्याच्या मंजुरीची गरज असल्याचंही सांगितलं जात आहे. दोन दिवसांत नागपूरचं अधिवेशन संपेल. मुंबईला जाऊन ऍडव्होकेट जनरलकडून यासंदर्भात मार्गदर्शन घेऊ. हा कायदा लागू करण्यासंदर्भात माहिती पूर्ण घेतल्याशिवाय बोलणं योग्य ठरणार नसल्याचंही अजितदादांनी स्पष्ट केलं आहे.
कर्जमाफीसंदर्भात काल बैठक होणार होती, पण ती काल होऊ शकली नाही. कारण काँग्रेसचे प्रमुख नेते नागपुरात मुक्कामाला आलेले आहेत. मुख्यमंत्री आणि पवार साहेबांची भेट दुपारी ठरलेली आहे. भेट झाल्यानंतर पवारसाहेब औरंगाबादला जातील. पवारसाहेबांचा औरंगाबादला कार्यक्रम आहे. अजित दादा पवार म्हणाले की, राज्याची आर्थिक परिस्थिती, उत्पन्नाचे स्रोत, जीएसटीचा हिस्सा या सगळ्या गोष्टी पाहूनच कर्जमाफी करावी लागणार.
Visit : bahujannama.com