नुकतेच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ताफ़्यात इलेक्ट्रिसिटीवर चालणारी बस दाखल झाली आहे. याच बसच्या लोकापर्ण सोहळा पार पडला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एसटी कामगारांसाठी निवासस्थानांच्या जमिनीचं भूमिपूजन करण्यात आले. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते देखील उपस्थित लावली होती. परंतु यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमास दांडी मारली यामुळे युती मध्ये नेमकं काय सुरु आहे, असा संभ्रम सध्या निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे युतीच्या चर्चेवरून काही बिनसलं का?अश्या चर्चाना उधाण आले आहे.
दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ युतीच्या जागा वाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तरी युतीच्या जागा वाटपासंदर्भातील अंतिम निर्णय अजून घेण्यात आलेला नाही. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकमताने त्याबाबत निर्णय घेतील. येत्या 2 दिवसांत जागा वाटपाचे अंतिम सूत्र निश्चित होणार आहे. बुधवारी मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या? याबाबत आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. यावेळी शिवसेनेचे सुभाष देसाई , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील आमच्यासोबत उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेले वक्तव्य निरर्थक असल्याचेही महाजन यांनी यावेळी सांगितले.
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ५०- ५० फॉर्म्युलावर ठाम असल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, मात्र शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी ११० – १६० चा फॉर्म्युलाला साफ नकार दिला आहे. शिवसेना आजही ५० – ५० च्या फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विधानसभेच्या जागावाटपांचं सूत्र हे लोकसभेवेळीच निश्चित झाल्याचं राऊत म्हणाले.
केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाई नेते रामदास आठवले यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील मित्रपक्षांसाठी भाजपा-शिवसेनेनं १८ जागांपैकी रिपाइंला १० जागा द्याव्यात अशी मागणी करत, ही निवडणूक रिपाई भाजपाच्या चिन्हावर लढणार नाही तर स्वतःच्या चिन्हावर लढवेल असंही आठवले यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आटवले यांची हि मागणी पूर्ण होते कि नाही, याचे सर्वांकडे लक्ष लागून आहे.
- ‘रक्तदान’ करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ ७ गोष्टी, अन्यथा होईल वाईट परिणाम
- तारुण्यातच टक्कल पडले असल्यास तुमच्यासाठी आहेत ‘हे’ रामबाण उपाय
- ‘हळद’ आरोग्यासाठी चांगली, परंतु या लोकांनी चुकूनही सेवन करू नये
- चहापत्तीने ‘केस’ होतात काळे, करून पाहा ‘हे’ ५ घरगुती उपाय
- लग्नानंतरही बिपाशा बसु आहे फिट, जाणून घ्या तिचे 11 ‘ब्युटी सिक्रेट’
- हातांच्या तळव्यांना पाहून कळतात ‘लिव्हर डॅमेज’सहीत ‘हे’ ५ आजार, जाणून घ्या
- ‘सोनम कपूर’लाही आहे ‘डायबिटीज’, रुग्णांनी ‘या’ ४ गोष्टींची घ्यावी काळजी
- बुद्धी तल्लख, तर अॅलर्जी होईल दूर, काही दिवस रोज खा ‘पाइन नट्स’
केवळ अशा लोकांनाच असते ‘सरोगेसी’द्वारे अपत्यप्राप्तीची परवानगी