बहुजननामा ऑनलाईन – नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चांगलाच दंड आकारला जात आहे. सामान्य माणूस असो की मंत्री प्रत्येकावर कठोर कारवाई केली जात आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानचे मंत्री प्रमोद जैन भाया यांनी वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे वाहतुक पोलीसांनी त्याना दंड भरायला लावला. जैन आपल्या पत्नीसोबत बारणच्या प्रताप चौकातून दुचाकीवर निघाले होते. मात्र त्यांनी आणि त्यांच्या पत्नीनेही हेल्मेट न घातल्यामुळे वाहतुक पोलीसांनी त्यांना दोनशे रुपयांची दंडाची रक्कम भरायला लावली आहे. विनाहेल्मेट वाहन चालविण्यासाठी 200 रुपयांचे चलान फाडले आहे. ही घटना मंगळवारी (ता.३) घडली.
एक सप्टेंबरपासून नवा केंद्रीय मोटार वाहन कायद्यांतर्गत नवीन तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. या नियमांतर्गत नियमांचे उल्लंघन केल्यास भारी दंड आकारला जाऊ शकतो. परंतु राजस्थानातील गेहलोत सरकारने अद्याप त्यास अधिसूचित केले नसल्याने तेथे जुन्या तरतुदींतर्गत राज्यात दंड आकारला जात आहे.
- ‘रक्तदान’ करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ ७ गोष्टी, अन्यथा होईल वाईट परिणाम
- तारुण्यातच टक्कल पडले असल्यास तुमच्यासाठी आहेत ‘हे’ रामबाण उपाय
- ‘हळद’ आरोग्यासाठी चांगली, परंतु या लोकांनी चुकूनही सेवन करू नये
- चहापत्तीने ‘केस’ होतात काळे, करून पाहा ‘हे’ ५ घरगुती उपाय
- लग्नानंतरही बिपाशा बसु आहे फिट, जाणून घ्या तिचे 11 ‘ब्युटी सिक्रेट’
- हातांच्या तळव्यांना पाहून कळतात ‘लिव्हर डॅमेज’सहीत ‘हे’ ५ आजार, जाणून घ्या
- ‘सोनम कपूर’लाही आहे ‘डायबिटीज’, रुग्णांनी ‘या’ ४ गोष्टींची घ्यावी काळजी
- बुद्धी तल्लख, तर अॅलर्जी होईल दूर, काही दिवस रोज खा ‘पाइन नट्स’
केवळ अशा लोकांनाच असते ‘सरोगेसी’द्वारे अपत्यप्राप्तीची परवानगी