मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – त्या काळी जर सावरकर देशाचे पंतप्रधान असते तर पाकिस्तान जन्मालाच आला नसता असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याची स्तुती करत त्यांना भारतरत्न देण्याच्या मागणीचे समर्थन केले. सावरकरांना भारतरत्न देऊन गौरवण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. सावरकर : इकोज फ्रॉम अ फरगॉटन पास्ट या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते.
‘सावरकरांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव केला पाहिजे’
उद्धव ठाकरे म्हणाले की, “आमचं सरकार हिदुंत्ववादी सरकार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव केला पाहिजे. आम्ही महात्मा गांधी आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केललं कार्य नाकारत नाही.” असे त्यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्यावीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची ठाकरेंनी याआधीही मागणी केली होती.
https://twitter.com/ANI/
तर नेहरूंना नायक म्हणण्यास आमची हरकत नव्हती
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, “देशासाठी काही काळ नेहरूंनी तुरुंगवास भोगल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. मी त्यांना सांगू इच्छितो की, सावरकर यांनी 14 वर्षांचा तुरुंगवास भोगला आहे. त्यांनी मरणयातना भोगल्या आहेत. नेहरूंनी 14 मिनिटांसाठी जरी तुरुंगात राहून अशा यातना भोगल्या असत्या तर त्यांना नायक म्हणण्यास आमची हरकत नव्हती. राहुल गांधींना या पुस्तकांची प्रत दिली पाहिजे असे म्हणत त्यांनी त्यांच्यावरही निशाणा साधला.
‘हे खूप दुर्दैवी आहे’
उद्धव ठाकरे म्हणाले, “सावरकरांना ज्या तुरुंगात ठेवण्यात आलं त्याचा आज पिकनिक स्पॉट केला आहे हे खूप दुर्दैवी आहे. त्यांनी तुरुंगात किती यातना भोगल्या आहेत हे लोकंना माहिती नाही. काही लोकांसाठी तुरुंग हा पिकनिक स्पॉटच झाला आहे.”
visit : bahujannama.com
- ‘या’ १० सौदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा