मुंबई : बहुजननामा ऑनलाइन : आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपांसाठी शिवसेना – भाजप नेते जोरदार दावे -प्रतिदावे करत एकमेकांचीं कानउघडणी करत आहेत. त्यात आता ‘जागावाटपाचं चित्र रंगवणारे ते जरी पेंटर असतील तरी आम्ही कापायचं काम करणारे कारपेंटर आहोत, ‘ असा टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.
काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी जागावाटपा संदर्भात दावा केला होता कि, ‘ २०१४ च्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा कायम ठेवत युती जागावाटप करणार आहे. ‘ यालाच उत्तर देत संजय राऊत यांनी नाव न घेता टीका केली होती. संजय राऊत चंद्रकांत पाटील याना इशारा देत म्हणाले कि, पाटील काय म्हणाले माहित नाही, पण त्यांच्या म्हणण्यानुसार ३०० टक्के युती होणार पण मी म्हणतो ५५० टक्के युती होणार. त्यामुळे विधानसभेसाठी जागावाटपा संदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल. जे ठरलं आहे सगळं त्याचप्रमाणे होईल , मुंबईमध्ये काय आकडा आणायचा आहे तो आम्ही आणूच.’
‘शिवसेनेत होणाऱ्या मेगाभरतीमुळे हे सिद्ध होत आहे कि, अनेकांना शिवसेनेचे विचार पटत आहेत. उद्धव ठाकरे यांचे नेत्तृत्व सगळ्यांना मान्य आहे. आम्ही सर्वांची पारख करूनच पक्षात प्रवेश देत आहोत. शिवसेनेला योग्य जागा मिळतील, जागावाटपात मानाचं स्थान लिहायला आणि सांगायला सोपं आहे, पण शिवसेना मानाच्या स्थानावर उभी आहे. ‘ असेही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.